शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विधानसभेच्या औरंगाबादमधील तिन्ही जागा लढण्याचा जलील यांचा दावा चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:32 IST

कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील.

औरंगाबाद : ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढविणार, असा केलेला दावा अत्यंत चुकीचा आहे. ‘एमआयएम’ हा वंचित बहुजन आघाडीचा मित्रपक्ष आहे आणि आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील. त्यामुळे असा दावा करणे चुकीचे आहे, असे आघाडीचे नेते मुकुंद सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे औरंगाबादेत होते. शहरातील विविध कार्यकर्ते, नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दुपारी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम व औरंगाबाद मध्य विधानसभा या तिन्ही मतदारसंघांतून ‘एमआयएम’ निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन आघाडीने त्या जागा सोडाव्यात, असे आवाहन केले. त्यांच्या या विधानासंबंधी शहरात प्रामुख्याने आघाडीचे पदाधिकारी, आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 

प्रातिनिधिक स्वरुपात मुकुंद सोनवणे यांनी सांगितले की, एकीकडे बहुजन आघाडीकडे ‘एमआयएम’ने ८० जागांचा प्रस्ताव दिल्याचे खासदार जलील सांगतात. त्यानंतर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांची निवडणूक ‘एमआयएम’ लढणार, असेही तेच म्हणतात. शेवटी वंचित बहुजन आघाडीचे नेते हे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील, कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची ते. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांनी आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिलेला असला, तरी त्यांना १० किंवा त्यापेक्षाही कमी जागा मिळतील. त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे दावे करू नयेत. शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघ त्यांना सुटेल. त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघांतून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील विधानसभेसाठी इच्छुक असणाºया कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालविली आहे. वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद मध्यची जागा हवी आहे. शिवाय राखीव मतदारसंघ असलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावरही वंचित आघाडी दावा करु शकते, असे चित्र आहे. 

राज्यात ‘एमआयएम’च्या अस्तित्वाबद्दल शंकाखासदार जलील यांच्या वक्तव्यावर शहरातील वंचित आघाडीच्या एका बड्या नेत्याने अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, वंचित आघाडी म्हणजे केवळ दलित- मुस्लिमांची आघाडी नाही. कधीही विचारपूर्वक भूमिका व्यक्त केली पाहिजे. ४‘एमआयएम’ने गेल्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ ठिकाणी निवडणूक लढविली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात जलील यांना आंबेडकरी पक्ष- संघटनांच्या मतदारांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे ते निवडून आले. ४याही वेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून समाजाने एकगठ्ठा मतदान केले आणि ते निवडून आले. मात्र, मुस्लिम समाजाने औरंगाबाद वगळता अन्य लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेले नाही. त्यामुळे राज्यात ‘एमआयएम’चे अस्तित्व आहे की नाही, हीच शंका आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीImtiaz Jalilइम्तियाज जलील