शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विधानसभेच्या औरंगाबादमधील तिन्ही जागा लढण्याचा जलील यांचा दावा चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:32 IST

कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील.

औरंगाबाद : ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढविणार, असा केलेला दावा अत्यंत चुकीचा आहे. ‘एमआयएम’ हा वंचित बहुजन आघाडीचा मित्रपक्ष आहे आणि आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील. त्यामुळे असा दावा करणे चुकीचे आहे, असे आघाडीचे नेते मुकुंद सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे औरंगाबादेत होते. शहरातील विविध कार्यकर्ते, नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दुपारी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम व औरंगाबाद मध्य विधानसभा या तिन्ही मतदारसंघांतून ‘एमआयएम’ निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन आघाडीने त्या जागा सोडाव्यात, असे आवाहन केले. त्यांच्या या विधानासंबंधी शहरात प्रामुख्याने आघाडीचे पदाधिकारी, आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 

प्रातिनिधिक स्वरुपात मुकुंद सोनवणे यांनी सांगितले की, एकीकडे बहुजन आघाडीकडे ‘एमआयएम’ने ८० जागांचा प्रस्ताव दिल्याचे खासदार जलील सांगतात. त्यानंतर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांची निवडणूक ‘एमआयएम’ लढणार, असेही तेच म्हणतात. शेवटी वंचित बहुजन आघाडीचे नेते हे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील, कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची ते. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांनी आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिलेला असला, तरी त्यांना १० किंवा त्यापेक्षाही कमी जागा मिळतील. त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे दावे करू नयेत. शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघ त्यांना सुटेल. त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघांतून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील विधानसभेसाठी इच्छुक असणाºया कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालविली आहे. वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद मध्यची जागा हवी आहे. शिवाय राखीव मतदारसंघ असलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावरही वंचित आघाडी दावा करु शकते, असे चित्र आहे. 

राज्यात ‘एमआयएम’च्या अस्तित्वाबद्दल शंकाखासदार जलील यांच्या वक्तव्यावर शहरातील वंचित आघाडीच्या एका बड्या नेत्याने अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, वंचित आघाडी म्हणजे केवळ दलित- मुस्लिमांची आघाडी नाही. कधीही विचारपूर्वक भूमिका व्यक्त केली पाहिजे. ४‘एमआयएम’ने गेल्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ ठिकाणी निवडणूक लढविली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात जलील यांना आंबेडकरी पक्ष- संघटनांच्या मतदारांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे ते निवडून आले. ४याही वेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून समाजाने एकगठ्ठा मतदान केले आणि ते निवडून आले. मात्र, मुस्लिम समाजाने औरंगाबाद वगळता अन्य लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेले नाही. त्यामुळे राज्यात ‘एमआयएम’चे अस्तित्व आहे की नाही, हीच शंका आहे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीImtiaz Jalilइम्तियाज जलील