शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

जळकोट तालुका झाला टँकरमुक्त

By admin | Updated: May 26, 2014 00:25 IST

जळकोट : जळकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रातही वाढ झाली आहे.

जळकोट : जळकोट तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रातही वाढ झाली आहे. विहिरी व तलावातील पाण्याची पातळीही कायम राहिल्यामुळे तालुक्यातील ४७ गावांपैकी येवरी, उमरदरा वगळता सर्व गावांतील पाणीप्रश्न मार्गी लागल्याने जळकोट तालुका टँकरमुक्त झाला आहे. जळकोट हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र निसर्गाच्या कृपेने सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, जमिनीअंतर्गत पाण्याची पातळी वाढल्यामुळे मे अखेरपर्यंत पाणीपातळी टिकून राहील, एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळा संपत आला तरी प्रशासकीय अधिकारी जळकोट तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबत निश्चिंत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने वरदान ठरणार्‍या तिरु नदीवरील १६ कि.मी. अंतरावरील पाच बॅरेजेस तयार झाल्यास याचा फायदा शेतकर्‍यांना होणार असून, या माध्यमातून तालुक्यातील हजारो हेक्टर्स जमिनी ओलिताखाली येऊन शेतकर्‍यांच्या जीवनात हरितक्रांती निर्माण होणार आहे. तालुक्यातील अनेक वाडी-तांड्यांवर पाणी योजना उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना आजही चलमे यांच्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. याचीही प्रशासनाने दखल घेऊन पर्यायी व्यवस्था केली आहे. (वार्ताहर) याबाबत जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्याशी संपर्क केला असता तालुक्यात फक्त येवरी गावात पाणीटंचाई असल्याचे नागरिकांनी कळविले असून, येथील विहीर अधिग्रहण करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाणार आहे.