शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

By सुमित डोळे | Updated: November 4, 2023 12:53 IST

गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात आणखी गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर : डिझेल इंजिनवरून रेल्वे आता इलेक्ट्रिक इंजिनवर येण्याच्या प्रक्रियेने आता वेग धरला असून, जालना-उस्मानपूरदरम्यान ५३ किलोमीटरचे रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे या विभागात एकूण २२७ किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून उस्मानपूर, परभणी, मुदखेड, धर्माबाददरम्यानच्या विभागांमध्ये लवकरच विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या संपूर्ण रेल्वेमार्ग वीज तारांनी जोडला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेचे स्वतंत्र वीज उपकेंद्रही उभारले जात असून, डिसेंबर २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या कामाचे चार टप्पे असून, पहिल्या टप्प्यात उस्मानपूर ते परभणी, परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड आणि नांदेड ते मुदखेड या चार टप्प्यांत कामे सुरू आहेत. आतापर्यंत अकोला ते पूर्णा, पिंपळकुटी ते मुदखेड, परळी ते परभणी, अंकाई ते जालना, जालना ते उस्मानपूरदरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मनमाड, मुदखेड, ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला २०१५-२़१६ मध्ये ७८३ किलोमीटर अंतरासाठी अंदाजे ८६५ कोटी रुपये खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी मनमाड, धर्माबाददरम्यान अंदाजे ४२० किमी रेल्वे ट्रॅकचा समावेश आहे.

फायदा काय?रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवरमधील बदल टाळून आणि कोचिंग आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील खोळंबा कमी करून रेल्वेची अखंड हालचाल सुरू राहते. परिणामी, गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होते; तसेच इंधनाच्या खर्चातही बचत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन