शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

By सुमित डोळे | Updated: November 4, 2023 12:53 IST

गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात आणखी गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर : डिझेल इंजिनवरून रेल्वे आता इलेक्ट्रिक इंजिनवर येण्याच्या प्रक्रियेने आता वेग धरला असून, जालना-उस्मानपूरदरम्यान ५३ किलोमीटरचे रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे या विभागात एकूण २२७ किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून उस्मानपूर, परभणी, मुदखेड, धर्माबाददरम्यानच्या विभागांमध्ये लवकरच विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या संपूर्ण रेल्वेमार्ग वीज तारांनी जोडला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेचे स्वतंत्र वीज उपकेंद्रही उभारले जात असून, डिसेंबर २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या कामाचे चार टप्पे असून, पहिल्या टप्प्यात उस्मानपूर ते परभणी, परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड आणि नांदेड ते मुदखेड या चार टप्प्यांत कामे सुरू आहेत. आतापर्यंत अकोला ते पूर्णा, पिंपळकुटी ते मुदखेड, परळी ते परभणी, अंकाई ते जालना, जालना ते उस्मानपूरदरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मनमाड, मुदखेड, ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला २०१५-२़१६ मध्ये ७८३ किलोमीटर अंतरासाठी अंदाजे ८६५ कोटी रुपये खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी मनमाड, धर्माबाददरम्यान अंदाजे ४२० किमी रेल्वे ट्रॅकचा समावेश आहे.

फायदा काय?रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवरमधील बदल टाळून आणि कोचिंग आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील खोळंबा कमी करून रेल्वेची अखंड हालचाल सुरू राहते. परिणामी, गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होते; तसेच इंधनाच्या खर्चातही बचत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन