शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

By सुमित डोळे | Updated: November 4, 2023 12:53 IST

गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात आणखी गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर : डिझेल इंजिनवरून रेल्वे आता इलेक्ट्रिक इंजिनवर येण्याच्या प्रक्रियेने आता वेग धरला असून, जालना-उस्मानपूरदरम्यान ५३ किलोमीटरचे रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे या विभागात एकूण २२७ किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून उस्मानपूर, परभणी, मुदखेड, धर्माबाददरम्यानच्या विभागांमध्ये लवकरच विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या संपूर्ण रेल्वेमार्ग वीज तारांनी जोडला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेचे स्वतंत्र वीज उपकेंद्रही उभारले जात असून, डिसेंबर २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या कामाचे चार टप्पे असून, पहिल्या टप्प्यात उस्मानपूर ते परभणी, परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड आणि नांदेड ते मुदखेड या चार टप्प्यांत कामे सुरू आहेत. आतापर्यंत अकोला ते पूर्णा, पिंपळकुटी ते मुदखेड, परळी ते परभणी, अंकाई ते जालना, जालना ते उस्मानपूरदरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मनमाड, मुदखेड, ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला २०१५-२़१६ मध्ये ७८३ किलोमीटर अंतरासाठी अंदाजे ८६५ कोटी रुपये खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी मनमाड, धर्माबाददरम्यान अंदाजे ४२० किमी रेल्वे ट्रॅकचा समावेश आहे.

फायदा काय?रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवरमधील बदल टाळून आणि कोचिंग आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील खोळंबा कमी करून रेल्वेची अखंड हालचाल सुरू राहते. परिणामी, गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होते; तसेच इंधनाच्या खर्चातही बचत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन