शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पोकरा घाेटाळ्यातील अधिकाऱ्यावर कारवाई ऐवजी पदोन्नतीचे बक्षीस; 'कृषी'चा अजब कारभार

By बापू सोळुंके | Updated: September 16, 2024 19:34 IST

जालन्यातही पोकरा घोटाळा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कृषी विभागाच्या जालना येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संगनमत करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

छत्रपती संभाजीनगर : पोकरा योजनेत कोट्यवधींची अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार कृषी आयुक्तालयाकडून सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षता पथकाच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या जालनाच्या तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना कृषी अधीक्षकपदी पदोन्नोती देत त्यांची बदली सोलापूर येथे करण्यात आली. विशेष म्हणजे तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयी कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कृषी विभागाच्या जालना येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संगनमत करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकामार्फत जालना जिल्ह्यातील पोकरा योजनेची तपासणी करण्यात आली, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. चव्हाण यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेडनेटचा लाभ देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर ग्राम कृषी संजीवनी समितीची मंजुरी व त्यानंतर तांत्रिक पडताळणी करूनच अर्जास पूर्वसंमती दिली जाते. जागेवर तपासणी आणि विविध घटकांकडून छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास अनुदान दिले जाते. मात्र, ३९ शेडनेटला मान्यता देण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ४६ लाख ५१ हजार ८१५ रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले होते. नियमानुसार २ ते ५ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ६५ टक्के अनुदान देय असताना, त्यांना ७५ टक्के अनुदान दिले. ही रक्कम ३ लाख ८० हजार ८७६ रुपये आहे. शेडनेट उभारण्यासाठी कोणत्या दर्जाचे साहित्याचा वापर करावा, याविषयीच्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले. हा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार जाफराबाद येथील काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश गवळी यांनी विभागीय कृषी सहसंचालक, कृषी आयुक्त, कृत्रीमंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर दक्षता समितीने जालना जिल्ह्यात जाऊन तपासणी केली. तेव्हा दक्षता समितीनेही पोकरा घोटाळ्यावर शिक्कामाेर्तब करणारा अहवाल दिला.

दक्षता समितीचा रिपोर्ट डावलून पदोन्नतीसूत्रांनी सांगितले की, पोकरा घोटाळ्यावर दक्षता समितीने सविस्तर अहवाल दिल्यानंतर कृषी आयुक्तालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हा अहवाल दाबून ठेवला. शासनाला माहिती न देता कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शीतल चव्हाण यांच्या बढतीची शिफारस केली. यानंतर शासनाने चव्हाण यांना कृषी अधीक्षकपदी बढती देत त्यांची सोलापूर येथे बदली केली. चव्हाण या सध्या सोलापूर ‘आत्मा’च्या संचालक आहेत.

दोषींवर गुन्हे नोंद व्हावेजालना जिल्ह्यात पोकरा योजनेत सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. याविषयी कृषी आयुक्तालय ते मुख्यमंत्र्यापर्यंत लेखी तक्रारी केल्या. यानंतर दक्षता समितीच्या तपासणी या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले. शिवाय लेखा परीक्षणातही अनियमितता असल्याचे आढळून आले होते. दोषींकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याची शिफारस दक्षता पथकाने केली होती. यानंतर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करणे गरजेचे होते. शिवाय त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवे. मात्र. तसे न करता शासनाने त्यांना बढती देत भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येते.- सुरेश गवळी, तक्रारदार तथा उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCorruptionभ्रष्टाचार