शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 16:19 IST

वेरुळ लेण्यांसमोरील किर्तीस्तंभ हटवू नये, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.

औरंगाबाद : सर्व जगाला ‘जिओ और जिनो दो’ हा अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या २५००व्या निर्वाण महोत्सवानिमित्त वेरुळ लेण्यासमोर ( Ellora Caves ) किर्तीस्तंभ ( Jain Kirtistanbha ) उभारण्यात आला आहे. यापुढेही हा स्तंभ त्याच ठिकाणी राहील. स्तंभ हटविण्यात येणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat karad ) यांनी शहरातील सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

पुरातत्व विभागाने वेरुळ लेण्याजवळील किर्तीस्तंभ हटवण्याचे पत्र जैन समाजाला दिले होते. त्यामुळे जैन समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी डॉ. कराड यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, भगवान महावीर यांच्या २५०० निर्वाण महोत्सवानिमित्त सरकारने तीन ठिकाणी किर्तीस्तंभ उभारले. यापैकी एक औरंगाबादेत, दुसरा कन्नडमध्ये, तर तिसरा वेरुळ लेण्यासमोरील जागेत आहे. सकल जैन समाजाने नव्हे, तर शासनाने किर्तीस्तंभ उभारला होता. मात्र, हा स्तंभ हटविण्यासाठी पुरातत्व विभागाने अहवाल दिला आहे. हा अहवाल समाजात तेढ निर्माण करणारा आहे. हा किर्तीस्तंभ व पहाड मंदिर जिथे आहे तिथेच राहावे, यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, असे त्यांनी निवेदन केले.

यानंतर सकल जैन समाजाच्यावतीने डॉ. कराड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले की, किर्तीस्तंभ जैन समाजाचाच नव्हे, तर सर्व समाजाचा आहे. यासंदर्भात २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पुरातत्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांना भेटून यासंदर्भात ‘जैसे थे’ आदेश काढण्यात येतील. त्यांच्या आश्वासनाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी कर्नाटक येथील माजी आ. संजय पाटील, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक राजू शिंदे, तसेच समाजाचे उपाध्यक्ष डी. बी. कासलीवाल, ललित पाटणी, विलास साहुजी, महावीर ठोेले, प्रमोद कासलीवाल, देवेंद्र काला, माणिक गंगवाल, जी. एम. बोथरा, महावीर सेठी, आनंद सेठी, विनोद लोहाडे, हर्षवर्धन जैन, दिनेश गंगवाल, शैलेश पाटणी, संजय पापडीवाल, प्रवीण लोहाडे, डॉ. प्रेमचंद पाटणी, मनोज बोरा आदींची उपस्थिती होती.

आश्वासनाने आनंद झालावेरुळ लेण्यासमोरील किर्तीस्तंभ हटवि्ण्यात येणार नाही. तिथेच राहील व यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीयस्तर व पाठपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्याने आनंद झाला.- वर्धमान पांडे, अध्यक्ष, पार्श्वनाथ ब्रह्माचर्याश्रम जैन गुरुकुल, वेरुळ.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतRajendra Dardaराजेंद्र दर्डाAjantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबाद