शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 16:19 IST

वेरुळ लेण्यांसमोरील किर्तीस्तंभ हटवू नये, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.

औरंगाबाद : सर्व जगाला ‘जिओ और जिनो दो’ हा अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या २५००व्या निर्वाण महोत्सवानिमित्त वेरुळ लेण्यासमोर ( Ellora Caves ) किर्तीस्तंभ ( Jain Kirtistanbha ) उभारण्यात आला आहे. यापुढेही हा स्तंभ त्याच ठिकाणी राहील. स्तंभ हटविण्यात येणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat karad ) यांनी शहरातील सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

पुरातत्व विभागाने वेरुळ लेण्याजवळील किर्तीस्तंभ हटवण्याचे पत्र जैन समाजाला दिले होते. त्यामुळे जैन समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी डॉ. कराड यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, भगवान महावीर यांच्या २५०० निर्वाण महोत्सवानिमित्त सरकारने तीन ठिकाणी किर्तीस्तंभ उभारले. यापैकी एक औरंगाबादेत, दुसरा कन्नडमध्ये, तर तिसरा वेरुळ लेण्यासमोरील जागेत आहे. सकल जैन समाजाने नव्हे, तर शासनाने किर्तीस्तंभ उभारला होता. मात्र, हा स्तंभ हटविण्यासाठी पुरातत्व विभागाने अहवाल दिला आहे. हा अहवाल समाजात तेढ निर्माण करणारा आहे. हा किर्तीस्तंभ व पहाड मंदिर जिथे आहे तिथेच राहावे, यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, असे त्यांनी निवेदन केले.

यानंतर सकल जैन समाजाच्यावतीने डॉ. कराड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले की, किर्तीस्तंभ जैन समाजाचाच नव्हे, तर सर्व समाजाचा आहे. यासंदर्भात २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पुरातत्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांना भेटून यासंदर्भात ‘जैसे थे’ आदेश काढण्यात येतील. त्यांच्या आश्वासनाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी कर्नाटक येथील माजी आ. संजय पाटील, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक राजू शिंदे, तसेच समाजाचे उपाध्यक्ष डी. बी. कासलीवाल, ललित पाटणी, विलास साहुजी, महावीर ठोेले, प्रमोद कासलीवाल, देवेंद्र काला, माणिक गंगवाल, जी. एम. बोथरा, महावीर सेठी, आनंद सेठी, विनोद लोहाडे, हर्षवर्धन जैन, दिनेश गंगवाल, शैलेश पाटणी, संजय पापडीवाल, प्रवीण लोहाडे, डॉ. प्रेमचंद पाटणी, मनोज बोरा आदींची उपस्थिती होती.

आश्वासनाने आनंद झालावेरुळ लेण्यासमोरील किर्तीस्तंभ हटवि्ण्यात येणार नाही. तिथेच राहील व यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीयस्तर व पाठपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्याने आनंद झाला.- वर्धमान पांडे, अध्यक्ष, पार्श्वनाथ ब्रह्माचर्याश्रम जैन गुरुकुल, वेरुळ.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतRajendra Dardaराजेंद्र दर्डाAjantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबाद