शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जायकवाडी धरणात अर्ध्या टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:36 IST

जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती. यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. मंगळवारी धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मंगळवारी मध्यरात्रीपासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून संततधार कायम असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जायकवाडीत येणारी आवक सतत वाढत आहे.पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊसरविवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत विक्रमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत पुन्हा इगतपुरी १४३ मि.मी. व त्र्यंबकेश्वर (पान २ वर)नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून गंगापूर, दारणा, पुणंद व चणकापूर या धरणांतून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी या विसर्गात दुपटीने वाढ करण्यात आली. दारणा धरणातून १०,६०० क्युसेक, तर गंगापूर धरणातून ९,३०२ क्युसेक क्षमतेने आजही विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. मात्र, नांदूर-मधमेश्वर बंधा-यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग दुप्पट करीत तो २९,५९४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरीस पूर आला असून, गतीने हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.तीन तासांतअर्धा टक्का वाढजायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९ टक्के एवढा होता. दरम्यान, तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजता जलसाठा १९.३० टक्के एवढा झाला होता. धरणात ११.०७१ द.ल.घ.मी. एवढी वाढ नोंदविली गेली.मंगळवारी धरणात एकूण जलसाठा १,१५७.२४० द.ल.घ.मी., तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस