शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जायकवाडी धरणात अर्ध्या टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:36 IST

जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती. यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. मंगळवारी धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मंगळवारी मध्यरात्रीपासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून संततधार कायम असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जायकवाडीत येणारी आवक सतत वाढत आहे.पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊसरविवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत विक्रमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत पुन्हा इगतपुरी १४३ मि.मी. व त्र्यंबकेश्वर (पान २ वर)नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून गंगापूर, दारणा, पुणंद व चणकापूर या धरणांतून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी या विसर्गात दुपटीने वाढ करण्यात आली. दारणा धरणातून १०,६०० क्युसेक, तर गंगापूर धरणातून ९,३०२ क्युसेक क्षमतेने आजही विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. मात्र, नांदूर-मधमेश्वर बंधा-यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग दुप्पट करीत तो २९,५९४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरीस पूर आला असून, गतीने हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.तीन तासांतअर्धा टक्का वाढजायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९ टक्के एवढा होता. दरम्यान, तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजता जलसाठा १९.३० टक्के एवढा झाला होता. धरणात ११.०७१ द.ल.घ.मी. एवढी वाढ नोंदविली गेली.मंगळवारी धरणात एकूण जलसाठा १,१५७.२४० द.ल.घ.मी., तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस