शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
5
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
6
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
7
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
8
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
9
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
10
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
11
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
13
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
14
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
15
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
16
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
17
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
18
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
19
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
20
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

जायकवाडी ९० टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:17 IST

जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.

ठळक मुद्दे४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता

पैठण (जि. औरंगाबाद) : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.मंगळवारी नाशिक व नगर जिल्ह्यास पावसाने झोडपले. यात करंजवन ४८ मि.मी., गंगापूर ११४ मि. मी., दारणा २४ मि. मी., भंडारदरा ९५ मि.मी., पालखेड ३८ मि.मी., निळवंडे ८३ मि. मी., नाशिक १८ मि.मी., कन्नड १८ मि. मी., कोतूळ ४५ मि.मी., राहुरी २६ मि. मी., राहाता २८ मि.मी., शिर्डी २८ मि. मी., पिंपळगाव बसवंत ५६ मि.मी., इगतपुरी ८३ मि.मी., घोटी ७३ मि.मी., त्र्यंबकेश्वर ६०  मि.मी, विंचूर २८ मि.मी, आढळा ४५ मि.मी, कश्यपी ७२ मि.मी, गौतमी ६३ मि.मी, कडवा २८ मि.मी, भावली ६८ मि.मी, व वाकी ६५  मि.मी अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सुध्दा पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी पाऊस सुरू होता. यामुळे काठोकाठ भरलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांपैकी दारणा ४३१६, गंगापूर २७४२, पालखेड १७३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत असून हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात १८९३० क्युसेक क्षमतेने सोडण्यात येत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून २२७७५, भंडारदरा धरणातून ५६७३ क्युसेक असा विसर्ग सुरू असून हे सर्व पाणी ओझर वेअर बंधाºयात जमा होते. ओझर वेअर बंधाºयातून प्रवरेच्या पात्रात १३००० क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी व प्रवरा नदीपात्रातून ३१९३० क्युसेक पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे.  बुधवारी धरणात ६२०६ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. बुधवारी मध्यरात्रीनंतर हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणात फक्त दोन फूट जागा१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी १५२० फूट झाली आहे. धरणात आता फक्त दोन फूट जागा शिल्लक राहिली आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक, पूर नियंत्रणासाठी राखीव ठेवावे लागणारे पॉकेट, नियंत्रित विसर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून आवक लक्षात घेता येत्या ४८ तासांत जायकवाडी धरणातून विसर्ग करणे अनिवार्य आहे. पाणी सोडण्याबाबत  बुधवारी दिवसभर जायकवाडी प्रशासनाच्या प्राथमिक हालचाली सुरू होत्या.व्यापारी सतर्क२००६ ला जायकवाडी धरणातून २५०००० क्युसेक क्षमतेने जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला होता.  ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २००६ या दरम्यान पैठण शहर जलमय झाले होते. याचा सर्वाधिक फटका शहरातील व्यापाºयांना सोसावा लागला होता. त्यातच अनेक विमा कंपन्यांनी हात वर केल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही पाणी सोडणार असल्याने व्यापाºयांना भितीने ग्रासले असून व्यापारी जायकवाडी प्रशासनाच्या संपर्कात आहेत.