शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी ९० टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 20:17 IST

जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.

ठळक मुद्दे४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता

पैठण (जि. औरंगाबाद) : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडीची पाणीपातळी ९० टक्क्यांपेक्षा पुढे सरकल्याने येत्या ४८ तासांत धरणातून विसर्ग केल्या जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. सायंकाळी धरणात २६६९.७३७ दलघमी एकूण जलसाठा झाला होता. यापैकी १९३१.६३१ दलघमी जीवंत जलसाठा आहे.मंगळवारी नाशिक व नगर जिल्ह्यास पावसाने झोडपले. यात करंजवन ४८ मि.मी., गंगापूर ११४ मि. मी., दारणा २४ मि. मी., भंडारदरा ९५ मि.मी., पालखेड ३८ मि.मी., निळवंडे ८३ मि. मी., नाशिक १८ मि.मी., कन्नड १८ मि. मी., कोतूळ ४५ मि.मी., राहुरी २६ मि. मी., राहाता २८ मि.मी., शिर्डी २८ मि. मी., पिंपळगाव बसवंत ५६ मि.मी., इगतपुरी ८३ मि.मी., घोटी ७३ मि.मी., त्र्यंबकेश्वर ६०  मि.मी, विंचूर २८ मि.मी, आढळा ४५ मि.मी, कश्यपी ७२ मि.मी, गौतमी ६३ मि.मी, कडवा २८ मि.मी, भावली ६८ मि.मी, व वाकी ६५  मि.मी अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सुध्दा पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी पाऊस सुरू होता. यामुळे काठोकाठ भरलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांपैकी दारणा ४३१६, गंगापूर २७४२, पालखेड १७३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत असून हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात १८९३० क्युसेक क्षमतेने सोडण्यात येत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून २२७७५, भंडारदरा धरणातून ५६७३ क्युसेक असा विसर्ग सुरू असून हे सर्व पाणी ओझर वेअर बंधाºयात जमा होते. ओझर वेअर बंधाºयातून प्रवरेच्या पात्रात १३००० क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी व प्रवरा नदीपात्रातून ३१९३० क्युसेक पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे.  बुधवारी धरणात ६२०६ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. बुधवारी मध्यरात्रीनंतर हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणात फक्त दोन फूट जागा१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी १५२० फूट झाली आहे. धरणात आता फक्त दोन फूट जागा शिल्लक राहिली आहे. यामुळे उर्ध्व भागातून येणारी आवक, पूर नियंत्रणासाठी राखीव ठेवावे लागणारे पॉकेट, नियंत्रित विसर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून आवक लक्षात घेता येत्या ४८ तासांत जायकवाडी धरणातून विसर्ग करणे अनिवार्य आहे. पाणी सोडण्याबाबत  बुधवारी दिवसभर जायकवाडी प्रशासनाच्या प्राथमिक हालचाली सुरू होत्या.व्यापारी सतर्क२००६ ला जायकवाडी धरणातून २५०००० क्युसेक क्षमतेने जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला होता.  ६ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट २००६ या दरम्यान पैठण शहर जलमय झाले होते. याचा सर्वाधिक फटका शहरातील व्यापाºयांना सोसावा लागला होता. त्यातच अनेक विमा कंपन्यांनी हात वर केल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही पाणी सोडणार असल्याने व्यापाºयांना भितीने ग्रासले असून व्यापारी जायकवाडी प्रशासनाच्या संपर्कात आहेत.