शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

जायकवाडीत गतवर्षीपेक्षा २० टक्क्यांनी कमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:41 IST

जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला यंदा २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही, तर जायकवाडीतील पाणीसाठा चिंतादायक ठरू शकतो.

ठळक मुद्देचिंता : दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तने; गेल्या १८ दिवसांपासून पावसाने फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला यंदा २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही, तर जायकवाडीतील पाणीसाठा चिंतादायक ठरू शकतो.पावसाने दडी मारल्याने ३ आॅगस्टपासून जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. सध्या डाव्या कालव्यातून ५०० अणि उजव्या कालव्यातून ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा २ आॅगस्ट रोजी ३२.११ टक्के होता. शनिवारी (दि.४) हा पाणीसाठा ३१.८७ टक्क्यांवर आला. गतवर्षी म्हणजे ४ आॅगस्ट २०१७ रोजी हाच पाणीसाठा ५२.२० टक्क्यांवर होता. वर्षभरापूर्वी धरण अर्धे भरलेले होते; परंतु सध्या मागील वर्षापेक्षा २०.३३ टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.जायकवाडीच्या लाभक्षेत्रात गेल्या १८ दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागातील पिकांवर संकट निर्माण झाले. खरिपाच्या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी जायकवाडीच्या लाभक्षेत्रातून त्वरित पाणी सोडण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांकडून करण्यात आली. कडा प्रशासनाने खरिपाची एक पाणीपाळी देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. प्रस्तावाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली आणि शुक्रवारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे आवर्तन २१ दिवसांचे राहणार आहे. यात डाव्या कालव्यातून ८० दलघमी आणि उजव्या कालव्यातून २० दलघमी इतके पाणी सोडण्यात येत आहे.पाण्याचे नियोजनजायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ५०० आणि उजव्या कालव्यातून ८०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. साधारण साडेतीन टीएमसी पाणी शेतकºयांना मिळणार आहे. जायकवाडीतील एकीकडे पाणीसाठा कमी होण्याची चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळेल, असे समाधान शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात