शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

...ही कुणाची अवकृपा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २,३०० जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची प्रकरणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:38 IST

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणांत राजकीय शिरकाव

छत्रपती संभाजीनगर : जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनावर राजकीय भूमिकेतून आरोप सुरू झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या कार्यालयात २,३०० प्रमाणपत्रांच्या संचिकांचा गठ्ठा जमा झाला आहे. ही कुणाची अवकृपा आहे, ज्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे. राजकीय शिरकाव्यामुळे प्रशासकीय अधिकारीही जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देताना सावधपणे निर्णय घेत आहेत.

घाटी प्रशासनाकडून विलंबाच्या प्रमाणपत्रांसोबतच नियमित प्रमाणपत्रांसाठीही नागरिकांना उपविभागीय कार्यालयाकडे पाठविले जाते. नियमित प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे म्हणत उपविभागीय कार्यालय घाटीत जाण्याचा सल्ला देतात. अशी ससेहोलपट नागरिकांची होत असून, यावर आठ महिन्यांपासून काहीही उपाय निघण्यास तयार नाही.

घाटी रुग्णालयात दररोज अनेक प्रसुती होतात. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील महिलांच्या प्रसुतींचा त्यात समावेश असतो. यासोबतच घाटीसह खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूही हाेतात. संबंधितांना मनपा, घाटीतून जन्म - मृत्यूचे प्रमाणपत्र दिले जाते. नियमानुसार जन्म - मृत्यूच्या वर्षभराच्या आतील प्रमाणपत्र असेल तर ते घाटीतून दिले जाते. त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर त्यासाठी उपविभागीय कार्यालयात अर्ज करावा लागतो.

नागरिकांचे असे हेलपाटेघाटी रुग्णालयात प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्यांना उपविभागीय कार्यालयात पाठविले जाते. बुधवारी अनेक जण उपविभागीय कार्यालयात आले होते. त्यातील काही जणांबाबत त्यांच्या पाल्याचा जन्म सहा ते सात महिन्यांपूर्वीच घाटीत झालेला आहे. तरीदेखील त्यांना उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात आले होते.

पूर्वी काय आणि आता काय...मार्च २०२५पूर्वी चार ते पाच कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय होत असे.परंतु मार्च २०२५नंतर शासनाच्या अध्यादेशानुसार १८ कागदपत्रांचे पुरावे दिले तरच प्रमाणपत्र मिळते.

शासन आदेशानुसारच निर्णयजन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने जे आदेश दिले आहेत, त्यानुसारच निर्णय होईल.- व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcollectorजिल्हाधिकारी