शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

मनपाचा कोंडवाडा नव्हे, हे तर कारागृह

By admin | Updated: March 22, 2016 01:31 IST

औरंगाबाद : शहरातील मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने फिरते पथक स्थापन केले आहे. या पथकाने दोन महिन्यांपूर्वी ब्रिजवाडी येथून एक गाय पकडून आणली.

औरंगाबाद : शहरातील मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने फिरते पथक स्थापन केले आहे. या पथकाने दोन महिन्यांपूर्वी ब्रिजवाडी येथून एक गाय पकडून आणली. या गायीने कोंडवाड्यात एका वासराला जन्म दिला. अन्नाअभावी दोन दिवसांत वासरू मरण पावल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. कोंडवाडा म्हणजे एकप्रकारे कारागृह असल्याचा धक्कादायक खुलासाही दोषी डॉक्टरांनी केला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले.ब्रिजवाडी येथील मंगलाबाई जाधव यांच्या मालकीच्या दोन गायी मनपाच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी पकडून आणल्या. या गायी पकडून आणताना जाधव यांना कोणीही कल्पना दिली नाही. मंगलाबाई यांनी गायींचा अनेक ठिकाणी शोध घेतला. चार दिवसांपूर्वी त्यांना समजले की, गायी सिद्धार्थ उद्यान परिसरातील कोंडवाड्यात आहेत. त्या तेथे आल्या. त्यातील एक गाय गाभण होती. गाय जनल्याचे निदर्शनास आले; मात्र वासरू आजूबाजूला नव्हते. कर्मचाऱ्यांना विचारले असता २ मार्च रोजी गायीने एका वासराला जन्म दिला होता. दुसऱ्याच दिवशी ते मरण पावले, असे सांगण्यात आले. गायी परत हव्या असतील तर १३ हजार ३०० रुपये दंड भरावा लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. वासरू मरण पावल्याचा धक्का मंगलाबाई यांना बसला होता. गायींवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोंडवाड्याजवळ त्या हताश होऊन बसल्या. याच वेळी महापौर तेथे आले. त्यांनी माहिती विचारली असता गायीचे वासरू मरण पावल्याचे सांगण्यात आले. हा धक्कादायक प्रकार पाहून महापौर कोंडवाड्यात पोहोचले. तेथील विदारक चित्र पाहून महापौर अवाक् झाले. कोंडवाड्याचे प्रमुख डॉ. शाहेद शेख यांनी नमूद केले की, साहेब, कोंडवाडा म्हणजे कारागृह...येथे सोयी-सुविधा नसतात. हे वाक्य ऐकून महापौर अधिक खवळले. मुक्या प्राण्यांना कारागृह काय माहीत. येथे येणाऱ्या प्राण्यांना चारा, पाणी का देण्यात येत नाही. यावर अधिकारी निरुत्तर झाले.