शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

हे तर ‘एमआयएम’ विरुद्ध युतीचे षड्यंत्र; इम्तियाज जलील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:10 IST

मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाविरुद्ध महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने षड्यंत्र रचून पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तेथेही नगरसेवकपद रद्द झाल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असे प्रतिपादन रविवारी आ. इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देदमडी महल येथील अतिक्रमण पाडताना मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याच्या आरोपातून शनिवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आ. जलील पुढे म्हणाले की, ज्या नियमानुसार आमच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली, त्या नियमात नगरसेवक बसतच नाहीत

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाविरुद्ध महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने षड्यंत्र रचून पाच नगरसेवकांना अपात्र करण्याचा ठराव घेतला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. तेथेही नगरसेवकपद रद्द झाल्यास आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असे प्रतिपादन रविवारी आ. इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

दमडी महल येथील अतिक्रमण पाडताना मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याच्या आरोपातून शनिवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव त्वरित शासनाकडे पाठविण्याचे आदेशही महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आ. जलील पुढे म्हणाले की, ज्या नियमानुसार आमच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली, त्या नियमात नगरसेवक बसतच नाहीत. अतिक्रमण कारवाईत नगरसेवकांनी अडथळा निर्माण केला तर नगरसेवकपद रद्द होऊ शकते. आमचे नगरसेवक कारवाई करा म्हणून घटनास्थळी हजर होते. कायद्याचे ज्ञान आम्हालाही आहे. शासन यावर योग्य तो निर्णय घेईल. कारवाई झालीच तर आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.

मागील ३० वर्षांमध्ये मनपावर युतीची सत्ता आहे. या तीन दशकांमध्ये शहराचा युतीनेच सत्यानाश केला. टीडीआरची ज्या पद्धतीने विधानसभेतून चौकशी लावली त्याच पद्धतीने आणखी बरेच घोटाळे समोर आणण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. युतीने आमच्या विरोधात युद्ध पुकारले असून, आम्हीसुद्धा यासाठी सक्षम आणि तयार आहोत. पत्रकार परिषदेला डॉ. गफ्फार कादरी, विरोधी पक्षनेते फेरोज खान, गटनेते नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, गंगाधर ढगे, शहराध्यक्ष अब्दुल समीर, आरेफ हुसैनी, शेख अहेमद आदींची उपस्थिती होती.

चार वेळा पथक परतलेदमडी महल येथे श्रीराम पवार यांचे घर पाडण्यासाठी मनपाचे पथक चार वेळेस गेले. प्रत्येक वेळी पथकाला माघारी फिरावे लागले. पथकाला कोणी माघारी फिरायला लावले, याचीही चौकशी मनपा आयुक्तांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली. महापौर-उपमहापौर आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आहेत. उलट त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी मनपा आयुक्त, विभागीय आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. कोणत्या पदाधिकार्‍यांनी कुठे अतिक्रमण केले हेसुद्धा आम्ही बाहेर काढणार असल्याचे जलील यांनी सांगितले.

गरिबांना पाणी नाही अन्...शहरातील अनेक वसाहती तहानलेल्या असताना बीड बायपासवरील श्रीमंत व्यक्तींच्या वसाहतींना पाणी देण्यासाठी मनपा आयुक्तांवर दबाव टाकण्यात येतो, अशी सर्व प्रकरणे आता बाहेर काढण्यात येणार आहेत.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका