शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर प्रकल्पातून नऊ पाणीपाळ््या मिळणार

By admin | Updated: December 11, 2014 00:27 IST

नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार

नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार असल्यामुळे रबी, उन्हाळी हंगाम घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इसापूर प्रकल्पात रबी हंगाम २०१४-१५ च्या प्रारंभी १५ आॅक्टोबर २०१४ रोजी ७५८.१७ दलघमी म्हणजे ७८.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार रबी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी एकूण नऊ पाणीपाळ््या देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रबी हंगामातील पिकांना पाणी मिळणार आहे. इसापूर प्रकल्पात सध्या ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाणी आरक्षीत करुन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना रबी व उन्हाळी हंगामासाठी सिंचन विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे खरिपात बुडालेल्या शेतकऱ्यांना रबीने तरी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा वाटत आहे. यासंदर्भात नियोजन केले आहे. इसापूर धरणातून मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, केळी, हळद, ऊस, कापूस, तूर आदी पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. रबी हंगामातील चार रोटेशनपैकी २६ आॅक्टोबर २०१४ व २६ नोव्हेंबर २०१४ अशा दोन पाणीपाळ््या देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित २६ डिसेंबर २०१४ व २६ जानेवारी २०१५ अशा आणखी दोन पाणीपाळ््या सोडण्यात येणार आहेत. यामुळे सिंचनाखाली असलेल्या भागातील बळीराजाला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.यानंतर उन्हाळी हंगामाचेही संभाव्य नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन उन्हाळी हंगामासाठी १ मार्च ते ३० जून यादरम्यान पाच पाणीपाळ््या देण्यात येणार आहेत. उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. या निर्णयामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल़ (प्रतिनिधी)