शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यात नवीन जिल्ह्यांचा प्रस्तावच नसल्याचे स्पष्ट; थोरात, पवार, चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 02:00 IST

संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला त्यावेळी सहा जिल्हे होते.

औरंगाबाद : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई आणि नांदेडचे विभाजन करून किनवट जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित असताना लातूरचे विभाजन करून उदगीर जिल्हा निर्मितीची चर्चा सुरू झाल्याने मराठवाड्यात खळबळ उडाली. मात्र, असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरूवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला त्यावेळी सहा जिल्हे होते. त्यानंतर १९८१ साली औरंगाबादचे विभाजन करूनजालना जिल्हा आणि पुढे १९९९ साली परभणीचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.साठ वर्षांच्या काळानंतर आता लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांचा मराठवाडा प्रादेशिक विभाग आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तालय आहे.विभाग नऊ जिल्ह्यांचा करून आयुक्तालयाचे त्रिभाजन करण्याबाबत १० वर्षांपासूनच्या मागणीनंतर समितीने दिलेल्या अहवालावर शासनाने निर्णय घेतलेला नसतानाच लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी पुढे आली आहे.दीड दशकांपासून बीड आणि नांदेड जिल्ह्यांच्या विभाजनाकडेदुर्लक्ष करीत लातूर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुढे आल्याने बीड आणि नांदेड जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.नवीन जिल्ह्याची कल्पना नाही२८ नवीन जिल्हे होणार, अशा बातम्या चुकीच्या आहेत. आमच्याकडे याबाबत काहीही निर्णय नाही. १ जिल्हा तयार करायाचा म्हटले तर सरकाराला ७५० ते १ हजार कोटींचा खर्च येतो. कुणाच्या तरी मनातील कल्पना पुढे आली, आणि तीमांडली. मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये विचारले, मुख्यमंत्री, मुख्यसचिव म्हणाले अशी कोणतीही कल्पना नाही. एखाद्या जिल्ह्याचे विभाजन करतांना विचार करावा लागतो. अहमदनगर, बीड, नांदेड येथील मागण्या आल्या आहेत. आर्थिक परिस्थिती पाहून सरकारला ठरवावे लागते, असे अर्थमंत्री अजीत पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र