शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

'हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद'; नगरसेवक सय्यद मतीन यांची नेहमी वादग्रस्त कामावरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:49 IST

वादग्रस्त कामांमुळे मतीन यांच्यावर वेळोवेळी कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असा प्रस्ताव मागील एक वर्षापासून शासनाकडे पडून आहे.

औरंगाबाद : शहराच्या इतिहासात प्रथमच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या एमआयएम पक्षाने एप्रिल २०१५ मध्ये चमत्कार केला होता. पक्षाचे तब्बल २५ नगरसेवक निवडून आले. त्यात नगरसेवक सय्यद मतीन नेहमीच वादग्रस्त ठरले. पाणी प्रश्नावर महापौरांच्या अंगावर खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, वंदेमातरम् गीताचा अवमान करणे, महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे उर्दूत बोर्ड लावणे, आदी अनेक वादग्रस्त कामांमुळे त्यांच्यावर वेळोवेळी कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, असा प्रस्ताव मागील एक वर्षापासून शासनाकडे पडून आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये औरंगाबादेत एमआयएम पक्षाची अक्षरश: लाट आली होती. या लाटेत मध्य विधानसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले. त्याच्या पुढच्याच वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. सर्वत्र काँग्रेसविरोधी लाट असताना महापालिकेतही एमआयएमची जादू कायम होती. पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या या पक्षाला २५ नगरसेवक मिळाले. औरंगाबादकरांनी मोठ्या उमेदीने आपल्या हक्काचे प्रतिनिधी महापालिकेच्या सभागृहात पाठविले होते. अल्पावधीत औरंगाबादकरांची घोर निराशा झाली. महापालिकेत एमआयएम नगरसेवक वेगवेगळ्या कारणांवरून वादग्रस्त ठरू लागले.

१७ आॅगस्ट रोजी महापालिकेची नियमित सर्वसाधारण सभा सुरू असताना एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन बसलेले होते. वंदेमातरम्चा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर २४ आॅगस्ट रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी मतीन यांना अटक केली नव्हती. राजाबाजार भागात दंगल उसळल्यानंतर अटक केली होती.

१६ आॅक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन महापौर बापू घडमोडे यांची शेवटची सभा होती. सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवक आक्रमक झाले होते. नगरसेवक मतीन, शेख जफर यांनी राजदंड पळविला. यावेळी सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली. महापौरांच्या अंगावर खुर्च्याही त्यांनीच भिरकावल्या होत्या. या प्रकरणातही सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदवून गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही.अलीकडेच मतीन यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उर्दूत बोर्ड आणून परस्पर लावला होता. मनपा प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. फक्त बोर्ड काढून घेतला होता.

यानंतर, शुक्रवारी (दि.१७ ) सय्यद मतीन यांनी महानगरपालिकेच्या विशेष सभेत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावास विरोध करत वादग्रस्त व्यक्तव्य केले. यामुळे सभागृहात अभूपूर्व गोंधळ होत भाजप सदस्यांनी मतीन यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आज सकाळी सभागृहात गोंधळ केल्याच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मतीन यांनीसुद्धा भाजप नगरसेवकांवरही तक्रार दाखल केली आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस