शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अडत बाजारातील गर्दी रोखणे कृउबाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जाधववाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात गर्दी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी ...

औरंगाबाद : जाधववाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या फळ व भाजीपाल्याच्या अडत बाजारात गर्दी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे. किरकोळ विक्रेते व ग्राहक येथे दिसल्यास त्याच्यावर कारवाई करा, त्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.

भाजीपालाच्या अडत बाजारात होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ ते १७ मार्च दरम्यान फळ व भाजीपालाचा अडत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, आता शेतकरी व किरकोळ विक्रेते बाजार समितीबाहेरील रस्त्यावर बसू लागल्याने प्रशासनासमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी रस्त्यावरून विक्रेत्यांना उठविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीत भेट घेतली. त्यावेळी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, सचिव विजय शिरसाठ, संचालक शिवाजी दांडगे, देवीदास कीर्तीशाही यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला. त्यावेळीस जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांना त्रास, झाला नाही पाहिजे. यासाठी बाजार समितीने स्वतः नियोजन करावे. किरकोळ विक्रेते व ग्राहक यांच्यामुळे बाहेर समितीमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यांना शहरतील मनपाच्या मैदानावर स्थलांतरित करण्यासंदर्भात मी मनपा आयुक्तांशी चर्चा करतो. मात्र, बाजार समितीत होणारी गर्दी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

बाजार समितीचा प्रस्ताव

यापुढे भाजीपाल्याच्या अडत बाजारात

किरकोळ विक्रेते व ग्राहकांना येण्यास प्रतिबंध करण्यात येईल.

किरकोळ विक्रेते, ग्राहक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

दुकानासमोर किरकोळ विक्रेते बसले तर त्या दुकानदार अडत्याचे परवाने रद्द करण्यात येईल.

किरकोळ विक्रेत्यांना मनपाने अन्य मैदानावर बसण्याची परवानगी दिल्यास गर्दीचे विभाजन होईल व बाजार समितीवरील ताण कमी होईल.