शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाचा सिंचनाला फायदा; रबी, खरीप हंगामासाठी १४३८ दलघमी पाणी सोडण्यात येणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 19:08 IST

कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली.

ठळक मुद्देप्रथम पाणीपाळी राबविण्याच्या दृष्टीने १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याने सोडण्यात येणारजायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा १५० टक्के  पाऊस झाला. परिणामी विभागातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, त्याचा फायदा सिंचनाला होणार आहे. आगामी रबी आणि खरीप हंगामात विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठे प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी प्रथम पाणीपाळी राबविण्याच्या दृष्टीने १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याने सोडण्यात येणार आहे. 

कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अध्यक्ष चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठ्या प्रकल्पावरील रबी प्रथम आवर्तनासाठी मान्यता दिली. बैठकीत प्रकल्पावरील उपलब्ध पाण्याचे रबी व उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सादरीकरण केले. 

नांदूर मधमेश्वरमधून पाणी देणारनांदूर मधमेश्वर प्रकल्पावरील लाभक्षेत्र हे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात मुकणे, भाम, भावली व वाकी धरणांत १०० टक्के पाणीसाठा आहे. बाष्पीभवन, घरगुती व औद्योगिक पाणीवापर, धरणाखालील बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतर उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे २ आवर्तन देणे प्रस्तावित आहे. 

­जायकवाडी प्रकल्पातील नियोजन असे...जायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे.  १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी देण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही कालव्यावर १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर व ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. त्यासाठी ११४८ दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.लोअर दुधनातूनही पाणी        लोअर दुधना धरणात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. बाष्पीभवन होऊन उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे प्रत्येकी ३ पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. यात १५ हजार १००  व ५ हजार ९२० हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित असून त्यात १५२ दलघमी पाणीवापर होईल. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरण