शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बेजबाबदार महावितरण; तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह शेळीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:49 IST

पहाटे झालेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे तारा तुटून पडल्या. मात्र ही बाब महावितरण विभागाला माहिती पडली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

फुलंब्री : शेतात शेळ्या चारत असताना तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श होऊन बसलेल्या जोराच्या झटक्याने एका शेतकऱ्यासह शेळीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरात शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण काळू म्हस्के(वय ६४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

वडोद बाजार येथील लक्ष्मण म्हस्के हे शेतकरी शेतीसोबत शेळीपालन करतात. शुक्रवारी सकाळच्या वेळी नेहमी प्रमाणे ते १५ शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या गट नं. ३ मधील गिरीजा नदीच्या काठावर गेले होते. दरम्यान त्या ठिकाणी विद्युत प्रवाहित तारा तुटून पडलेल्या होत्या. एका शेळीला या तारांचा स्पर्श होऊन शेळी जागीच कोसळली. शेळी कशी काय कोसळली हे पाहण्यासाठी लक्ष्मण म्हस्के धावले. त्यांनी शेळीला स्पर्श करताच तेसुद्धा तारेला चिकटले. यात त्यांचाही जागीच मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या घरी आल्या. मात्र लक्ष्मण म्हस्के न दिसल्याने कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती तात्काळ पाथ्री येथील महावितरण कार्यालयाला देण्यात आली. त्यांनी विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर म्हस्के यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महावितरणचा गलथान कारभारवडोदबाजार येथील स्मशानभूमीपासून काही अंतरावरील शेतवस्तीवर या विद्युत तारेद्वारे वीज पुरवठा केला जातो. शुक्रवारी पहाटे झालेल्या वादळवाऱ्यासह पावसामुळे सदरील तारा तुटून पडल्या. मात्र ही बाब महावितरण विभागाला माहिती पडली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेला महावितरणचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र