शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

औरंगाबादमध्ये गुन्हे शाखा व एटीएस पथक घेताहेत निर्वासितांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:49 IST

प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. 

ठळक मुद्देदेशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़

औरंगाबाद : प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़  या पथकात गुन्हे शाखेसह एटीएसचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़  त्यात ९ एपीआय, नऊ फौजदार आणि ३६ कर्मचारी असे ५४ जणांचा समावेश आहे़ देशातील संवेदनशील ठिकाणांची रेकी (पाहणी) करणारी ‘अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना देशाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकत्याच पुणे, महाड, अंबरनाथमध्ये केलेल्या कारवाईत एटीबीचे सदस्य असणार्‍या पाच बांगलादेशींना अटक केली होती. 

अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणार्‍या एटीबीच्या लक्ष्यस्थानी धार्मिक आणि पर्यटनस्थळांसह लष्कराचे तळही असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पकडलेल्या संशयितांकडे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा नकाशा आढळून आला आहे़  शिवाय एटीएसने पकडलेल्या संशयितांनी औरंगाबादेत तब्बल एका दिवसात १३ कॉल केल्याचे समोर आले आहे़  ते कॉल करण्यात आलेले नंबर आता बंद आहेत़  त्यामुळे एटीएस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़  त्या आदेशाप्रमाणे बांगलादेशींच्या शोधमोहिमेसाठी एटीएस आणि गुन्हे शाखेचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे़ यासाठी नऊ पथके तैनात करण्यात आली असून, त्या एका पथकात एक अधिकारी, चार कर्मचारी असा समावेश आहे. असा दुजोरा गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी  दिला.