शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

औरंगाबादमध्ये गुन्हे शाखा व एटीएस पथक घेताहेत निर्वासितांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:49 IST

प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. 

ठळक मुद्देदेशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़

औरंगाबाद : प्रतिबंधित देशातील लोकांची घुसखोरी शहरात करून कोणी वास्तव्यास आले आहे काय, हे शोधण्यासाठी गुन्हे शाखा व एटीएस कर्मचारी मिळून ९ पथके शहरात चाचपणीच्या कामाला मंगळवारपासून लागले आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांत एक कमांडर आणि त्याच्या तुकडीतील अतिरेकी वास्तव्य करीत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या गुप्तहेर विभागाने दिली आहे़ त्या शहराच्या यादीत औरंगाबादचा उल्लेख असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी ९ पथकांची स्थापना केली आहे़  या पथकात गुन्हे शाखेसह एटीएसचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़  त्यात ९ एपीआय, नऊ फौजदार आणि ३६ कर्मचारी असे ५४ जणांचा समावेश आहे़ देशातील संवेदनशील ठिकाणांची रेकी (पाहणी) करणारी ‘अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना देशाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नुकत्याच पुणे, महाड, अंबरनाथमध्ये केलेल्या कारवाईत एटीबीचे सदस्य असणार्‍या पाच बांगलादेशींना अटक केली होती. 

अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणार्‍या एटीबीच्या लक्ष्यस्थानी धार्मिक आणि पर्यटनस्थळांसह लष्कराचे तळही असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पकडलेल्या संशयितांकडे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचा नकाशा आढळून आला आहे़  शिवाय एटीएसने पकडलेल्या संशयितांनी औरंगाबादेत तब्बल एका दिवसात १३ कॉल केल्याचे समोर आले आहे़  ते कॉल करण्यात आलेले नंबर आता बंद आहेत़  त्यामुळे एटीएस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़  त्या आदेशाप्रमाणे बांगलादेशींच्या शोधमोहिमेसाठी एटीएस आणि गुन्हे शाखेचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे़ यासाठी नऊ पथके तैनात करण्यात आली असून, त्या एका पथकात एक अधिकारी, चार कर्मचारी असा समावेश आहे. असा दुजोरा गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी  दिला.