शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

जमीन व्यवहारांना चौकशीचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:14 IST

अकरा वर्षांपूर्वी भूसुधारचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाला प्रदान करण्याबाबत झालेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील इनामी, सीलिंग, महार हाडोळा जमिनींच्या प्रकरणात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता निर्माण झाली असून, ते सर्व व्यवहार चौकशीच्या फे-यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरा वर्षांपूर्वी भूसुधारचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाला प्रदान करण्याबाबत झालेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील इनामी, सीलिंग, महार हाडोळा जमिनींच्या प्रकरणात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता निर्माण झाली असून, ते सर्व व्यवहार चौकशीच्या फे-यात येणार आहेत.औरंगाबाद जिल्ह्यातील २७५ प्रकरणांत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत निवासी उपजिल्हाधिकारी आणि सामान्य प्रशासन उपजिल्हाधिका-यांसह वरिष्ठांनी जमीन प्रकरणात काय करून ठेवले आहे. याचा तपास करण्याचा विचार विभागीय आयुक्तांच्या डोक्यात आहे.२००६ पर्यंत उपजिल्हाधिकारी भुसूधार प्रकरणात निर्णय घ्यायचे. २००६ नंतर या पदाचे रूपांतर उपजिल्हाधिकारी महसूल तथा सामान्य प्रशासन असे करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिका-यांना भुसूधार करण्याचे स्वतंत्र अधिकार नाहीत, तर उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिका-यांना वाटप केलेल्या विषयानुसार अधिकार आहेत. उपविभागीय अधिकारी जिल्हाधिका-यांचे अधिकार आपल्या कार्यक्षेत्रात वापरू शकतात.२००६ नंतर निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्यातील कामकाजाचे वाटप करण्यात आले. शासनाने हे भूसुधारचे अधिकार देण्यापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त के.बी. भोगे यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. त्यांनी खातेविभाजन करण्याचा अभिप्राय दिल्यानंतर राज्यभरात सामान्य प्रशासन उपजिल्हाधिका-यांकडे भूसुधारचे अधिकार देण्याचा पॅटर्न लागू करण्यात आला; परंतु अधिकार विभाजनाचे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाला आजवर प्राप्त झालेले नाहीत.सध्या जिल्ह्यातील ३ वर्षांतील इनामी, सीलिंग, महार हाडोळा जमिनी प्रकरणात चौकशी गठित करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी यांच्यावर ठपका ठेवत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यात उपजिल्हाधिका-यांनी आजवर अनेक जमिनींच्या बाबतीत निवाडे दिले आहेत. ११ वर्षांत विभागातील निवासी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिका-यांनी अनेक घोटाळे करून ठेवले असतील. असा संशय आयुक्तांना आहे. शासनादेशानुसार निर्णय घेऊनही चौकशी होत असल्याने अधिकारी त्रस्त झाले आहेत.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ३ वर्षांतील जमीन प्रकरणात चौकशी गठित केली आहे. ११ वर्षांत ज्यांनी भूसुधारचे काम केले त्या अधिकाºयांनी २००६ च्या बदलानुसारच निवाडे, मंजु-या दिल्या आहेत. सध्या तरी विभागातील सर्व अधिकाºयांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.