शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

किराडपुरा प्रकरणी थेट पंतप्रधानांना पत्र; खासदार इम्तियाज जलील यांनी केली मोठी मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: April 7, 2023 18:41 IST

त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी स्वतः साक्षीदार असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असा आरोप खा. इम्तियाज यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: रामनवमीच्या आदल्या रात्री किराडपुरा येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमुर्तीमार्फत करावी, तसे आदेश राज्य सरकारला द्यावे अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या आदल्या रात्री किराडपुरा भागात जाळपोळीची दुर्देवी घटना घडली. यात पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जाळपोळ सुरु असताना मी स्वतः मंदिरात २ तासांहून अधिक काळ उपस्थित होतो. यावेळी तेथे केवळ १५ पोलीस होते. त्यांना मंदिराचे रक्षण आणि जाळपोळ, दगडफेक करणार्‍या जमावाला तोंड देण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी स्वतः साक्षीदार असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असा आरोप खा. इम्तियाज यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रामागे कोण आहेत याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पंतप्रधानांना खा. जलील यांनी केली आहे. 

पत्रातून अनेक प्रश्न केले उपस्थित समाजकंटकांना हिंसाचार करण्यास मोकळे का सोडण्यात आले ? त्या रात्री पोलिसांच्या १३ गाड्या जाळण्यात आल्या, तेव्हा पोलिस कुठे गेली होती? हा मोठा प्रश्न आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांना का थांबवण्यात आले ? सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? असे अनेक गंभीरस्वरुपाचे प्रश्न खा. जलील यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद