शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

किराडपुरा प्रकरणी थेट पंतप्रधानांना पत्र; खासदार इम्तियाज जलील यांनी केली मोठी मागणी

By मुजीब देवणीकर | Updated: April 7, 2023 18:41 IST

त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी स्वतः साक्षीदार असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असा आरोप खा. इम्तियाज यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: रामनवमीच्या आदल्या रात्री किराडपुरा येथे झालेल्या जाळपोळ प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमुर्तीमार्फत करावी, तसे आदेश राज्य सरकारला द्यावे अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीच्या आदल्या रात्री किराडपुरा भागात जाळपोळीची दुर्देवी घटना घडली. यात पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जाळपोळ सुरु असताना मी स्वतः मंदिरात २ तासांहून अधिक काळ उपस्थित होतो. यावेळी तेथे केवळ १५ पोलीस होते. त्यांना मंदिराचे रक्षण आणि जाळपोळ, दगडफेक करणार्‍या जमावाला तोंड देण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी स्वतः साक्षीदार असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात, असा आरोप खा. इम्तियाज यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रामागे कोण आहेत याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पंतप्रधानांना खा. जलील यांनी केली आहे. 

पत्रातून अनेक प्रश्न केले उपस्थित समाजकंटकांना हिंसाचार करण्यास मोकळे का सोडण्यात आले ? त्या रात्री पोलिसांच्या १३ गाड्या जाळण्यात आल्या, तेव्हा पोलिस कुठे गेली होती? हा मोठा प्रश्न आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांना का थांबवण्यात आले ? सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? असे अनेक गंभीरस्वरुपाचे प्रश्न खा. जलील यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद