शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

परीक्षेच्या कामात व्यवस्थापन परिषद सदस्याचा हस्तक्षेप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकुलगुरूंकडे तक्रार : अभियांत्रिकी उत्तरपत्रिका तपासणीच्या ठिकाणी सावळा गोंधळ

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलपरीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. याठिकाणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी गुरुवारी अनधिकृतपणे भेट दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना परीक्षा भवनतर्फे देण्यात आली, तर उत्तरपत्रिका तपासणीच्या ठिकाणी अनोळखी लोक काम करीत आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी मूल्यांकन संचालकांच्या कार्यालयात गेलो असल्याचा दावा डॉ. अंभोरे यांनी केला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा भवनमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि व्यवस्थापनशास्त्र या अभ्यासक्रमांच्या परीक्षा, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले आहे. यावर्षी किरकोळ घटना वगळता अभियांत्रिकीच्या परीक्षा विनागोंधळ पार पडल्या आहेत. सध्या परीक्षा भवनमध्ये असलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम सुरू आहे. या केंद्रात गुरुवारी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अंभोरे यांनी भेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकार नसताना डॉ. अंभोरे यांनी मूल्यांकन केंद्राची पाहणी करीत कर्मचाऱ्यांची माहिती विचारली. हा सर्व विभाग गोपनीय आहे. त्याठिकाणी परवानगीशिवाय कोणालाही जाण्यास बंदी आहे. हा नियमांचा भंग असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. याविषयी डॉ. अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षा भवनमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने गेलो होतो. बैठक संपल्यानंतर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र मूल्यांकन केंद्राच्या संचालकांची भेट घेतली. त्यांच्याकडून मूल्यांकनात काम करणाºयांची नावे घेतली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोपनीय विभागात कार्यरत असलेले कार्मचारी विद्यापीठाच्या परिचयाचेसुद्धा नसल्याचे पाहणीत समोर आले. दहावी पास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांसारख्या महत्त्वाच्या कामासाठी नेमले असल्याचे दिसून आले. याविषयी कुलगुरूंकडे शुक्रवारी सविस्तर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोट,मला याविषयी काहीही बोलायचे नाही. ज्यांनी भेट दिली त्यांनाच विचारा. घटनेची सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली आहे. त्यांनाच यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.- डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा