शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

‘वंचित’शी तलाकच्या मागे एमआयएममधील सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 16:24 IST

पक्षात दोन वेगवेगळे गट समोरासमोर आल्यास एकमेकांना आलिंगन देतात. पाठ वळताच पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही करतात.

ठळक मुद्देएमआयएममधील गटबाजी कारणीभूत  दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला शुक्रवारी सायंकाळी एमआयएमने एकतर्फी ‘तलाक’ दिला. एमआयएम पक्षाला विधानसभेच्या आठच जागा देण्यात येत असल्याचे कारण समोर करण्यात आले असले तरी युती तोडण्यासाठी पडद्यामागील अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. एमआयएम पक्षातील अंतर्गत गटबाजीच याला प्रमुख कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.

हैदराबादच्या मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने सर्वप्रथम मराठवाड्यात नांदेडमार्गे औरंगाबाद गाठले. याठिकाणी प्रथम विधानसभा, तर नंतर महापालिकेत पक्षाला घवघवीत यश मिळाले. बघता-बघता पक्षाचा एक खासदारही औरंगाबाद जिल्ह्यात निवडून आला. पक्षाच्या या राजकीय वाटचालीत नेत्यांची कमी आणि मतदारांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. पक्षात दोन वेगवेगळे गट समोरासमोर आल्यास एकमेकांना आलिंगन देतात. पाठ वळताच पाठीत खंजीर खुपसण्याचे कामही करतात. विशेष बाब म्हणजे या दोन्ही गटांनी नगरसेवकही वाटून घेतले आहेत. एका गटाचा नगरसेवक दुसऱ्या गटाच्या नेत्याकडे जात नाही. आदेशही मानत नाही. ही सुंदोपसुंदी अलीकडे बरीच वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षातील एका गटाला तिन्ही मतदारसंघांत एकही उमेदवार निवडून आलेला चालणार नाही. एकही उमेदवार निवडून आल्यास आपली एकाधिकारशाही संपुष्टात येईल, असा धोका आहे. विधानसभेच्या तिकीट वाटपातही पक्षात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. एमआयएमने एकतर्फी वंचितसोबत युती तोडण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यात दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एमआयएमने हैदराबाद येथील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.

युती तोडण्याचे पहिले कारणआगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षातील एका गटाने आता ‘बुद्धि’बळाचा खेळ मांडला आहे. एमआयएम-वंचित बहुजन आघाडीला एका व्यासपीठावर आणण्यासाठी ज्या नेत्याने सेतू तयार केला होता, तो सेतूचा पूल तोडण्याचे काम एका गटाने शुक्रवारी प्रखरतेने केले. कारण भविष्यात हा पूल अधिक मजबूत झाल्यास औरंगाबादेतील एका विधानसभा मतदारसंघात विरोधी गटाच्या नेत्याची वर्णी लागू शकते. वंचित-एमआयएमला वेगळे केल्यास विजयी होण्याचा प्रश्नच नाही.

युती तोडण्याचे दुसरे कारणएमआयएम पक्षातील एका नेत्याने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेच निवडणूक लढवावी यासाठी जोरदार प्रयत्न केले. पश्चिम विधानसभा मतदारसंघ अगोदरच अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मध्य विधानसभेत अनुसूचित जातीचा उमेदवार दिल्यास आपल्याला तिसऱ्या मतदारसंघात अनुसूचित जातीचे मतदान भरघोस मिळेल म्हणून व्यूहरचना आखली. याप्रमाणेच वंचितने मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. आता ज्याने हा चक्रव्यूह आखला होता तोच यात अलगदपणे अडकल्याचे बोलले जात आहे.  

ओवेसींच्या आदेशानंतरच निर्णयपक्षाचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशावरूनच युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पत्र दाखवून मंजुरी घेऊनच ते प्रसिद्धीस दिले. मी पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. आम्हाला ओवेसी यांचेच पत्र पाहिजे, असे कोणीही कोठूनही विचारणार असेल, तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. या विषयावर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनीच बोलावे. या निर्णयामुळे आपण एका दगडात दोन पक्षी मारले का? या प्रश्नावर असे काही नाही. पक्षाच्या हितासाठी हा निर्णय घेतला. कोणाचा फायदा-तोटा हे बघितले नाही.- इम्तियाज जलील, खासदार आणि प्रदेशाध्यक्ष एमआयएम

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबाद