शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

कनकवाडीवासियांशी संवाद

By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST

गोकुळ भवरे, किनवट किनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला.

गोकुळ भवरे, किनवटकिनवटहून सतरा किलोमीटर अंतरावरील कनकवाडी गावात औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी १० जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत त्यांना सर्व समस्या सोडवू तसेच प्रशासन आपल्याबरोबर असल्याचा विश्वास दिला. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास ग्रामसभा संपली.विभागीय आयुक्त जैस्वाल म्हणाले, ग्रामस्थांंचे सहकार्य असल्याने येथे अनेक शासकीय योजना आल्या आहेत. जनतेच्या सहकार्याशिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही. शासकीय योजना राबविताना ग्रामस्थांचे सहकार्य असल्याची बाब चांगली असल्याचे प्रशंसनीय उद्गार त्यांनी काढले.या ग्रामसभेत आयुक्तांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले तसेच तत्काळ मजुरी दिली. हा उपक्रम पहिल्यांदाच किनवट दौऱ्यात राबविण्यात आल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. आयसीआयसीआय बँकेमार्फत मजुरांना मग्रायोजनेची मजुरी वाटप केली जाणार आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल आणि मला मजुरी मिळाली नाही, या तक्रारी होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मुलांना शाळेत पाठवा, त्यांना शिकवा असे आवाहनही त्यांनी केले. पाऊस लांबल्याने किनवट तालुक्यावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सावट दूर होईल आणि येत्या काळात चांगला पाऊस पडेल याची मला खात्री आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. सरपंच पंडित व्यवहारे व ग्रामसेवक अतुल गावंडे यांनी विभागीय आयुक्त जैस्वाल यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सहशिक्षक सुरेश पाटील यांनी केले. तत्पूर्वी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तहसीलदार शिवाजी राठोड, बीडीओ डॉ. नामदेव केंद्रे, तालुका कृषी अधिकारी संजय कायंदे, माहुरचे बीडीओ पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंद्रे, नाईकवाडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाखोरे, सहायक अभियंता देवणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमावार आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. किनवटला प्रमुखांची आढावा बैठककिनवट तालुक्यातील कनकवाडी गावाला भेट देण्यापूर्वी औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीवकुमार जैस्वाल यांनी किनवट येथे गुरुवारी सर्व प्रमुखांची आढावा बैठक घेतली. वन हक्क कायदा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी प्रमुखांना दिल्या. यावेळी गोवर्धन मुंडे, रमेश खुपते, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर, केंद्रप्रमुख मडावी, पोलिस पाटील विलास सोळंके, उपसरपंच जयवंतराव जाधव, आत्माराम भिसे, गावकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.