शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

मिरचीवरील रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे

By admin | Updated: April 19, 2016 01:10 IST

जालना : मिरची पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचा सूर कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रांच्या बैठकीतून निघाला.

जालना : मिरची पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचा सूर कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रांच्या बैठकीतून निघाला. कृषी विज्ञान केंद्र , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मिरची पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर बैठक पार पडली. यावेळी कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी.भोसले यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी.एस. खंदारे, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. ए.पी. दवंडे, किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.आर. झंवर, वनस्पती विकृती शास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही.जी. मुळेकर, सहाय्यक प्रा. डॉ. बी.व्ही.भेदे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.व्ही.सोनुने, प्राचार्य डॉ. ओ.डी. कोहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भोसले म्हणाले, जालना मिरची उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून मिरची पिकावरील विषाणू रोगाच्या प्रादूर्भावामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटक नाशकाचा वापर करतात. वातावरणातील प्रदूषण, सुरक्षितता व उत्पादन खर्च कमी करून विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. डॉ. बी.व्ही.भेदे यांनी मिरची पिकावरील फुलकिडे व पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे विषाणूजन्य रोग वाढत असून योग्य वेळीच रोगांचे नियंत्रण करण्याचे आवाहन केले. डॉ.ए.पी. दवंडे यांनीही मार्गदर्शन केले. मिरची पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर मोड्यूल तयार करण्या संदर्भात चर्चा झाली. मिरची पिकावर मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी आपल्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या शेतावर शास्त्रीय पद्धतीने चाचण्या घ्याव्यात असे ठरले. यावेळी प्रगतीशील मिरची उत्पादक उद्धवराव खेडेकर, काकासाहेब साबळे, छायाताई मोरे, अरूण सरकटे यांनी बैठकीत सहभाग घेऊन आपले अनुभव कथन करून सूचना केल्या. प्रास्तविक एस. व्ही. सोनुने यांनी केले. आभार प्रा. अजय मिटकरी यांनी मानले. (प्रतिनिधी)