शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘हे राम’,“बुद्धम् शरणम् गच्छामी’ ऐवजी कर्णकर्कश सायरनने दडपतो जीव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:03 IST

औरंगाबाद: अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ वापरणे हे औरंगाबाद शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘हे राम’, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ हे स्वर ...

औरंगाबाद: अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ वापरणे हे औरंगाबाद शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘हे राम’, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ हे स्वर कानी पडले की, जवळून अंत्ययात्रा जातेय, हे कोणताही औरंगाबादवासीय न पाहताही सांगत असे. आता चित्र बदलले असून स्वर्गरथाची जागा कर्णकर्कश सायरनच्या ॲम्ब्युलन्सने घेतली आहे. कोरोनाकाळात दुर्दैवाने बहुतांश अंत्ययात्रा ॲम्ब्युलन्समधून स्मशानात येत असून आता स्वर्गरथही रस्त्याच्या कडेला धूळ खात उभे आहेत. औरंगाबादेत अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा वापर करण्यास जवळपास २० वर्षापूर्वी सुरुवात झाली. हा प्रयोग करणारे औरंगाबाद शहर राज्यातील पहिलेच असावे. पाहतापाहता स्वर्गरथाची संख्या ५० च्या घरात पोहोचली. या स्वर्गरथातून अंत्ययात्रा निघाली की , ‘तू अंतर्यामी सबका.... हे राम, हे राम’ हे गीत किंवा हरिहरनच्या आवाजातील “बुद्धम् शरणम् गच्छामी’ ही वंदना वाजविली जाते. हे चलन एवढे वाढले की, ही दोन्ही गीते जवळपास कोठेही ऐकू आली की , अंत्ययात्रा निघाली हे हमखास समजावे. परंतु या दोन्ही धार्मिक गीतांवर आता ॲम्ब्युलन्सच्या सायरनने मात केली आहे. शहरात दररोज ५० हून अधिक अंत्यविधी होत आहेत. त्यातील बहुतांश हे कोरोना बळी असल्याने हे मृतदेह रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सने थेट स्मशानभूमीत आणले जातात. त्यामुळे घरातून अंत्ययात्रा निघणेही बंद झाले आहे. स्मशानात अंत्यविधीसाठी जागा मिळत नसताना रस्त्यावरील अंत्ययात्रा बंद झाल्या आहेत. आता कर्णकर्कश सायरन वाजवत जाणाऱ्या ॲम्ब्युलन्समधून अंत्ययात्रा चाललीय की, रुग्णाला नेले जात आहे, याचा काहीही अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच स्वर्गरथ रस्त्याच्या कडेला धूळ खात उभे दिसतात. महामारी असताना स्वर्गरथाची चाके थंडावल्याचे स्वर्गरथावरील वाहक चव्हाण यांनी सांगितले.

चौकट

आठ तासात अस्थी न्या...

शहरातील सर्वच प्रमुख स्मशानभूमीत सध्या मृतदेहांवर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. एकानंतर एक अंत्यसंस्कार होत असल्यामुळे शेडऐवजी बाहेर चिता रचल्या जात आहेत. तीही जागा अपुरी पडत असल्याने स्मशानजोगी मृताच्या नातेवाईकांना ८ तासात अस्थी घेऊन जाण्यास सांगत आहेत. मुकुंदवाडी स्मशानभूमीत मंगळवारी एका कोरोना रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर स्मशानजोग्याने नातेवाईकांना सहा तासात अस्थी घेऊन जाण्याचे फर्मान सोडले. तुम्ही या, मी अस्थी थंड करून देतो, असेही तो म्हणाला. शेवटी नातेवाईकांनी विनवणी करून किमान २४ तास मागून घेतले. वेळेत आला नाही तर मी अस्थी जमा करून बाजूला काढून ठेवीन, असे सांगण्यासही तो विसरला नाही. यावरून स्मशानजोग्यावर आलेल्या कामाच्या लोडचा अंदाज येऊ शकतो.