शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

‘हे राम’,“बुद्धम् शरणम् गच्छामी’ ऐवजी कर्णकर्कश सायरनने दडपतो जीव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:03 IST

औरंगाबाद: अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ वापरणे हे औरंगाबाद शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘हे राम’, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ हे स्वर ...

औरंगाबाद: अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ वापरणे हे औरंगाबाद शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘हे राम’, ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ हे स्वर कानी पडले की, जवळून अंत्ययात्रा जातेय, हे कोणताही औरंगाबादवासीय न पाहताही सांगत असे. आता चित्र बदलले असून स्वर्गरथाची जागा कर्णकर्कश सायरनच्या ॲम्ब्युलन्सने घेतली आहे. कोरोनाकाळात दुर्दैवाने बहुतांश अंत्ययात्रा ॲम्ब्युलन्समधून स्मशानात येत असून आता स्वर्गरथही रस्त्याच्या कडेला धूळ खात उभे आहेत. औरंगाबादेत अंत्ययात्रेत स्वर्गरथाचा वापर करण्यास जवळपास २० वर्षापूर्वी सुरुवात झाली. हा प्रयोग करणारे औरंगाबाद शहर राज्यातील पहिलेच असावे. पाहतापाहता स्वर्गरथाची संख्या ५० च्या घरात पोहोचली. या स्वर्गरथातून अंत्ययात्रा निघाली की , ‘तू अंतर्यामी सबका.... हे राम, हे राम’ हे गीत किंवा हरिहरनच्या आवाजातील “बुद्धम् शरणम् गच्छामी’ ही वंदना वाजविली जाते. हे चलन एवढे वाढले की, ही दोन्ही गीते जवळपास कोठेही ऐकू आली की , अंत्ययात्रा निघाली हे हमखास समजावे. परंतु या दोन्ही धार्मिक गीतांवर आता ॲम्ब्युलन्सच्या सायरनने मात केली आहे. शहरात दररोज ५० हून अधिक अंत्यविधी होत आहेत. त्यातील बहुतांश हे कोरोना बळी असल्याने हे मृतदेह रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सने थेट स्मशानभूमीत आणले जातात. त्यामुळे घरातून अंत्ययात्रा निघणेही बंद झाले आहे. स्मशानात अंत्यविधीसाठी जागा मिळत नसताना रस्त्यावरील अंत्ययात्रा बंद झाल्या आहेत. आता कर्णकर्कश सायरन वाजवत जाणाऱ्या ॲम्ब्युलन्समधून अंत्ययात्रा चाललीय की, रुग्णाला नेले जात आहे, याचा काहीही अंदाज येत नाही. त्यामुळे सर्वच स्वर्गरथ रस्त्याच्या कडेला धूळ खात उभे दिसतात. महामारी असताना स्वर्गरथाची चाके थंडावल्याचे स्वर्गरथावरील वाहक चव्हाण यांनी सांगितले.

चौकट

आठ तासात अस्थी न्या...

शहरातील सर्वच प्रमुख स्मशानभूमीत सध्या मृतदेहांवर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. एकानंतर एक अंत्यसंस्कार होत असल्यामुळे शेडऐवजी बाहेर चिता रचल्या जात आहेत. तीही जागा अपुरी पडत असल्याने स्मशानजोगी मृताच्या नातेवाईकांना ८ तासात अस्थी घेऊन जाण्यास सांगत आहेत. मुकुंदवाडी स्मशानभूमीत मंगळवारी एका कोरोना रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर स्मशानजोग्याने नातेवाईकांना सहा तासात अस्थी घेऊन जाण्याचे फर्मान सोडले. तुम्ही या, मी अस्थी थंड करून देतो, असेही तो म्हणाला. शेवटी नातेवाईकांनी विनवणी करून किमान २४ तास मागून घेतले. वेळेत आला नाही तर मी अस्थी जमा करून बाजूला काढून ठेवीन, असे सांगण्यासही तो विसरला नाही. यावरून स्मशानजोग्यावर आलेल्या कामाच्या लोडचा अंदाज येऊ शकतो.