शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भोलानाथऐवजी कोविडनाथनेच दिली वर्षभराची सुटी; विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी झाली ‘बोअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:30 IST

कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी दि. १५ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

ठळक मुद्देशाळांना सुटी लागून उलटले चक्क वर्षसंकटापासून अनभिज्ञ असणाऱ्या निरागस बालकांनी सुटी जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. आता मात्र ही वर्षभरापासून मिळालेली सक्तीची सुटी ‘बोअर’ झाली असल्याचे बालकांनी सांगितले.

औरंगाबाद : ‘भोलानाथ भोलानाथ खरे सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा?’ अशी विनवणी करणाऱ्या बालगाेपाळांना भोलानाथने तर काही सुटी दिली नाही. पण, हा चमत्कार कोविडनाथने करून दाखविला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क एक वर्षाची सुटी दिली. 

बरोबर एक वर्षापूर्वी कोरोनारूपी संकट वेगाने येऊ लागले होते. त्यामुळे दि. १४ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी दि. १५ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. कोरोना आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागताच इयत्ता ५ वीपासून पुढील वर्ग काही काळासाठी सुरू झाले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी काही दिवसांसाठी का असेना, शाळेत हजेरी लावली होती. पण, कोरोनाचा कहर थांबत नसल्याने पूर्व प्राथमिक वर्ग ते इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांची सुटी मात्र अजूनही संपलेली नाही. पुढील संकटापासून अनभिज्ञ असणाऱ्या निरागस बालकांनी सुटी जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. पण, आता मात्र ही वर्षभरापासून मिळालेली सक्तीची सुटी ‘बोअर’ झाली असल्याचे बालकांनी सांगितले.

मुले सुरक्षित राहिली, हेच यशऑनलाइन शिक्षण मिळालेले आणि न मिळालेले असे विद्यार्थ्यांचे सरळ दोन गट पडले आहेत. ऑनलाइन शिक्षण फक्त ५०-५५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचले आहे, असा शिक्षण विभागाचा सर्व्हे आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा न मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांचे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, डोळ्यांचा त्रास, चिडचिडेपणा या आजारांच्या रूपात मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले आहे. मुलांचा दिनक्रम पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कलेचा कुंचला ऑनलाइन माध्यमातून घेऊन गुरुजी कला आणि व्यक्तिमत्त्त्व विकास घडवू शकत नाहीत. त्यासाठी शिक्षकांचा प्रत्यक्ष सहवासच आवश्यक असतो. यावर्षी सगळेच विद्यार्थी यापासून वंचित राहिले. तरीही महामारीच्या काळात मुले सुरक्षित राहिली, हेच यावर्षीचे मोठे यश आहे.- एस. पी. जवळकर.शिक्षणतज्ज्ञ

पालकांना वाटतेय भीतीवर्षभराची सुटी संपून मुले जेव्हा शाळेत जातील, तेव्हा एकाग्रता, लिहिण्याचा सराव, शाळेत ६-७ तास एकाच जागी बसण्याची सवय, शाळेची शिस्त, अभ्यासाची सवय मुलांना राहिलेली नसेल. या सर्व गोष्टींची सवय करून अभ्यासात पुन्हा मन रमविणे, ही मुलांसाठी अतिशय अवघड गोष्ट ठरणार आहे, अशी भीती काही पालक व्यक्त करत आहेत. वर्षभराच्या सुटीमुळे आपली मुले ‘होमसिक’ झाली आहेत, असे मतही काही पालकांनी व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा