शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:19 IST

गुलाब उद्यानाचे मात्र झाले वाळवंट

ठळक मुद्दे सुंदरता लोपली, गुलाबही सुकले उटीचा दर्जा हे स्वप्नच

औरंगाबाद : केंद्रीय पर्यटन विभागाने राज्याच्या पर्यटन राजधानीत गुलाबपुष्प फुलवून शहराला सुंदरता व मोहकता देण्याचे पाहिलेले स्वप्न कद्रू  व निष्काळजी महापालिकेने उधळून लावले.  उटीच्या धर्तीवर मजनू हिलवर ३ एकरात रोझ गार्डन फुलविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला. गुलाबांच्या १३ जातींनी हे उद्यान बहरले; पण अवघ्या वर्षभरात उद्यानात सुंदर गुलाबपुष्पांऐवजी कुरूप काटेच दिसत आहेत. 

मागील वर्षी जुलै महिन्यात नागरिकांसाठी उद्यान मोफत करण्यात आले. पहिल्याच दिवशी १,७७४ नागरिकांनी भेट दिली. उद्यानात उनाडांचा धुमाकूळ सुरू झाला. देशी पर्यटकांना उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले. अखेर चौथ्या दिवशीच मनपाने उद्यानाला कुलूप ठोकले. त्यानंतर उद्यान सुरू करण्यात आले नाही. ऐतिहासिक औरंगाबादेत दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना पाहण्यासाठी शहरात ऐतिहासिक पर्यटनस्थळे बरीच आहेत. सायंकाळी निवांत क्षण घालविण्यासाठी सुंदर रोझ गार्डनही असावे, अशी संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली. महापालिकेने केंद्रीय पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठविला.

केंद्र शासनाने तब्बल ३ कोटी रुपयांचे अनुदान दिले. या अनुदानातून गुलाबांच्या १४ पाकळ्यांमध्ये एक सुंदर उद्यान विकसित झाले.  उद्यानात सोफिया, ग्लॅडर, समरस्नो, स्कें टिमेंटा, क्रिसमिया, क्लासिक अ‍ॅक्ट, शॉकिंगब्ल्यू, अलिंका, अशा १३ जातींची झाडे लावण्यात आली. मागील ९ महिन्यांत उद्यानाची बरीच वाताहत झाली. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून उच्च प्रतीची गुलाबाची कलमे आणण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने उद्यानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता रोझ गार्डनची रयाच गेली आहे. जिकडेतिकडे मोडतोड झाली. दिवे फोडण्यात आलेत. पाण्याचा हौद कोरडा पडला आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी झाला होता. त्यासाठीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल केली नाही. 

उद्यानाचा सांभाळ मनपाला करणे अशक्यदारुडे, गोळ्यांची नशा करणारे गर्दुले रोझ गार्डनमध्ये धुडगूस घालत आहेत. खाजगी एजन्सी नियुक्त करून उद्यानाचा सांभाळ केल्यास पर्यटकांना उद्यानात आल्याचा अनुभूती येईल. 

झाडांची कटिंग केलीयथंडी सुरू होताच गुलाबाच्या झाडांची कटिंग केली जाते.  साधारणपणे जानेवारी महिन्यात फुले येण्यास सुरुवात होईल. मार्च महिन्यापर्यंत वेगवेगळ्या झाडांना फुले येत असतात. उद्यानातील गुलाबाची झाडे वाळलेली नाहीत. त्यांना खत आणि पाणी देण्याचे काम सुरू आहे. -विजय पाटील, उद्यान अधीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाtourismपर्यटन