शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मराठी शिक्षण कायदा, मराठी प्राधिकरणाबाबत मसाप आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:59 IST

आज मराठी शाळा झपाट्याने बंद पडत आहेत. मराठी भाषेच्या जगण्या- मरण्याशी सरकारला काही सोयरसुतक नाही, तसेच मराठी समाज आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून त्यांचे ‘मराठीपण’ ही ओळख आपल्याच हाताने पुसू पाहत आहे. असेच चालू राहिले, तर पुढील दोन पिढ्यांनंतर मराठी कोठेही शिकली, शिकवली जाणार नाही.

ठळक मुद्देसाहित्य : कृती कार्यक्रम तयार करून शासनाला देणार प्रस्ताव, २० जून रोजी बैठक

औरंगाबाद : आज मराठी शाळा झपाट्याने बंद पडत आहेत. मराठी भाषेच्या जगण्या- मरण्याशी सरकारला काही सोयरसुतक नाही, तसेच मराठी समाज आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून त्यांचे ‘मराठीपण’ ही ओळख आपल्याच हाताने पुसू पाहत आहे. असेच चालू राहिले, तर पुढील दोन पिढ्यांनंतर मराठी कोठेही शिकली, शिकवली जाणार नाही. पर्यायाने भाषेचे शिक्षण न मिळाल्यामुळे मराठीत साहित्यही निर्माण होणार नाही. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच आपल्याकडेही महाराष्ट्र मराठी शिक्षण कायदा लागू व्हावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी प्राधिकरण स्थापन व्हावे, याबाबत मराठवाडा साहित्य परिषद आग्रही असून, लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.ठाले पाटील म्हणाले की, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या तीन राज्यांनी आपल्या भाषांसाठी कायदा करून त्यांचे भाषा शिक्षण धोरण जाहीर केले आणि अंमलबजावणीही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनेही हा कायदा तातडीने करावा, अशी मागणी बडोदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत सरकारकडे आग्रह धरण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद साहित्य संस्था आणि महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचा संघ म्हणजेच साहित्य महामंडळ यांच्याशी चर्चा करून कृती कार्यक्रमाची आखणी करील, असे ठाले पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या येत्या अधिवेशनात शासनाने असा कायदा करावा यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, असेही त्यांनी सुचविले. यावेळी कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष के.एस. अतकरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. ऋषिकेश कांबळे आदींची उपस्थिती होती.चौकट :२० जून रोजी बैठकमहाराष्ट्र मराठी शिक्षण कायदा करण्यासाठी विविध स्तरांतील लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे दि.२० जून रोजी मराठवाडा साहित्य परिषद येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, साहित्य संस्था, मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य संस्थांच्या शाखांचे कार्यकर्ते, मराठीचे शिक्षक- प्राध्यापक, मराठी ग्रंथालये, वाचकांना या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत सर्वानुमते प्रस्ताव मांडला जाईल आणि तो राज्य शासनाला पाठविण्यात येईल, असे ठाले पाटील यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य