शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मराठी शिक्षण कायदा, मराठी प्राधिकरणाबाबत मसाप आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:59 IST

आज मराठी शाळा झपाट्याने बंद पडत आहेत. मराठी भाषेच्या जगण्या- मरण्याशी सरकारला काही सोयरसुतक नाही, तसेच मराठी समाज आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून त्यांचे ‘मराठीपण’ ही ओळख आपल्याच हाताने पुसू पाहत आहे. असेच चालू राहिले, तर पुढील दोन पिढ्यांनंतर मराठी कोठेही शिकली, शिकवली जाणार नाही.

ठळक मुद्देसाहित्य : कृती कार्यक्रम तयार करून शासनाला देणार प्रस्ताव, २० जून रोजी बैठक

औरंगाबाद : आज मराठी शाळा झपाट्याने बंद पडत आहेत. मराठी भाषेच्या जगण्या- मरण्याशी सरकारला काही सोयरसुतक नाही, तसेच मराठी समाज आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून त्यांचे ‘मराठीपण’ ही ओळख आपल्याच हाताने पुसू पाहत आहे. असेच चालू राहिले, तर पुढील दोन पिढ्यांनंतर मराठी कोठेही शिकली, शिकवली जाणार नाही. पर्यायाने भाषेचे शिक्षण न मिळाल्यामुळे मराठीत साहित्यही निर्माण होणार नाही. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच आपल्याकडेही महाराष्ट्र मराठी शिक्षण कायदा लागू व्हावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठी प्राधिकरण स्थापन व्हावे, याबाबत मराठवाडा साहित्य परिषद आग्रही असून, लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.ठाले पाटील म्हणाले की, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या तीन राज्यांनी आपल्या भाषांसाठी कायदा करून त्यांचे भाषा शिक्षण धोरण जाहीर केले आणि अंमलबजावणीही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनेही हा कायदा तातडीने करावा, अशी मागणी बडोदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत सरकारकडे आग्रह धरण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद साहित्य संस्था आणि महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचा संघ म्हणजेच साहित्य महामंडळ यांच्याशी चर्चा करून कृती कार्यक्रमाची आखणी करील, असे ठाले पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या येत्या अधिवेशनात शासनाने असा कायदा करावा यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, असेही त्यांनी सुचविले. यावेळी कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष के.एस. अतकरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. ऋषिकेश कांबळे आदींची उपस्थिती होती.चौकट :२० जून रोजी बैठकमहाराष्ट्र मराठी शिक्षण कायदा करण्यासाठी विविध स्तरांतील लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे दि.२० जून रोजी मराठवाडा साहित्य परिषद येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, साहित्य संस्था, मराठी साहित्यिक, पत्रकार, साहित्य संस्थांच्या शाखांचे कार्यकर्ते, मराठीचे शिक्षक- प्राध्यापक, मराठी ग्रंथालये, वाचकांना या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत सर्वानुमते प्रस्ताव मांडला जाईल आणि तो राज्य शासनाला पाठविण्यात येईल, असे ठाले पाटील यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य