शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

औरंगाबादसह मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:42 IST

औरंगाबाद रेल्वेस्थानकासमोरील इंजिनची दुरुस्ती करण्यासह रस्ते, ड्रेनेज, परिसर सुशोभीकरण आदींची कामे १५ आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्देविभागीय व्यवस्थापकांचे आदेश : १५ आॅगस्टपूर्वी इंजिनचे काम करा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्थानकासमोरील इंजिनची दुरुस्ती करण्यासह रस्ते, ड्रेनेज, परिसर सुशोभीकरण आदींची कामे १५ आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा यांनी शनिवारी दिले.नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा, वरिष्ठ डीओएम विक्रमादित्य, वरिष्ठ डीएम नागपुरे, विवेक जैन, डीसीएम नेहा रत्नाकर, सेक्युरिटी कमांडंट पांडे यांचे पथक शनिवारी पहाटे ४ वाजता औरंगाबाद स्थानकात दाखल झाले. विभागीय पथकाचा पाहणी दौरा पूर्वनियोजित असल्याने स्टेशनमास्तरसह विविध विभागांचे अधिकारी स्वागतासाठी सज्ज होते.सर्व विभागांतील अपडेटस् अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवले होते. पथकाने सकाळी ८ वाजता विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सकाळी ९ वाजता औरंगाबाद स्थानकातील तिकीट खिडकीसह पसिरातील रस्ते, गटार, इंजिन, बोर्डरूम्स व इतर भागांची पाहणी केली. परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करून सुशोभिकरण करण्याचे आदेश पथकातील अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिले. त्यानंतर देखभाल व दुरुस्ती विभागातील अधिकाºयांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. तो वरिष्ठांकडे दाखल केला असेल, तर त्याच्या स्थितीची माहिती अधिकाºयांकडून पथकाने जाणून घेतली. याचा पाठपुरावा करून सर्व कामे पंधरा आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश रभा यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.भूमिगत पुलाची मागणीसकाळी १०.३० वाजता मुकुंदवाडी स्थानकात पथक दाखल झाले. तेथील कामकाजाचा आढावा घेत स्वच्छता, पार्किंग, पथदिवे आदींबाबत काही सूचना अधिकाºयांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डबा यांच्यात अंतर जास्त असल्याने अपघात वाढले आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी रभा यांच्याकडे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी केली, तसेच मुकुंदवाडी स्थानकाच्या समोरील बाजूला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.या भागात वाहतुकीचा पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना रेल्वे रूळ ओलांडूनच दुसºया बाजूला यावे लागते. ते धोकादायक असून, यात एखाद्याचा बळी जाऊ शकतो. यावर उपाययोजना म्हणून भूमिगत पूल तयार करण्याची मागणी रभा यांच्याकडे करण्यात आली. यावर पुलाचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठविल्यास यावर विचार केला जाईल, असे रभा यांनी सांगितले. या पाहणीनंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पथक जालना रेल्वेस्थानकाकडे मार्गस्थ झाले.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन