शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा अभियानाची होणार चौकशी

By admin | Updated: May 14, 2017 00:43 IST

उस्मानाबाद :अभियानांतर्गत खर्च केलेल्या सर्व निधीची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भूम येथील आढावा बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष मदतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मागील अडीच वर्षात यातील २३ कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. मात्र या निधीची उधळपट्टी केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या अभियानांतर्गत खर्च केलेल्या सर्व निधीची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भूम येथील आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबतही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या विभागाच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.भूम, वाशी तालुक्यातील विविध कामांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूम येथील आलमप्रभू देवस्थानमधील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह आमदार सुजीतसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, ज्ञानराज चौगुले, राज्याचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णा गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असलीच पाहिजे, औपचारीकता म्हणून कामांचे परीक्षण पडताळणी करु नका, निधीचा विनीयोग योग्य रितीने होण्यासाठीची ही व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत त्यांनी जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, पीक कर्ज पुनर्गठन, राष्ट्रीय दुग्धविकास प्रकल्प, बळीराजा चेतना अभियान, मुख्यमंत्री सडक योजना तसेच तूर खरेदी आदींचा आढावा घेतला. सध्या तूर खरेदीची प्रक्रिया सुुरु आहे. ती खरेदी वेळेत पूर्ण करण्यासाठी जादा काटे लावा अशी सूचना करतानाच खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित गैरव्यवहारांच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी निधी वापरण्याच्या अनुषंगाने यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा, असे निर्देश त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार्डी येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे, प्लास्टीक अस्तरीकरण कामाचा धनादेश लाभार्थी शेतकरी बालाजी चौधरी यांना प्रदान करण्यात आला. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत वाशी तालुक्यामध्ये २७३ शेततळ्यांचा लक्षांक असून, ३३८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ३२५ अर्जांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, १४५ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत १६५ शेततळ्याचे काम सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर भूम तालुक्यातील आरसोली येथे मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची पाहणी केली. याच ठिकाणी त्यांनी आरसोली, देवळाली, तांबेवाडी या रस्त्याचे फीत कापून उद्घाटन केले.