शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

स्वस्त फक्त कांदे, बाकी वांधे !

By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST

बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे.

बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे. सततची भाववाढ व वाढत्या गरजा याचा मेळ घालताना महिला अक्षरश: मेटाकुटीला आल्या आहेत. किराणा सामान, भाजीपाला व फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. कांदे वगळता सध्या काहीच स्वस्त नाही. किचन बजेट कोलमडून पडल्याने सामान्यांच्या जगण्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.मागील सहा महिन्यांत किराणा सामानाच्या दरात होणाऱ्या वाढीला ‘ब्रेक’ तर बसलेलाच नाही; परंतु त्यात दिवसागणिक भर पडू लागली आहे. काही वस्तुंचे भाव तर दुप्पट झाले आहेत. उन्हाळयात कांद्याने सत्तरीचा दर पार केला होता. त्यामुळे ‘आम आदमी’च्या डोळ्यात पाणी आले होते. आता कांद्याचे दर १० रुपये किलोपर्यंत गडगडले आहेत. कांद्याला स्वस्ताई आली असली तरी मिरची, लसूण, टोमॅटो, बटाटे, कोबी, वांगे, लिंबू यांचे दर मात्र वाढतच आहेत. यंदा आतापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मात्र, काही पिके अद्याप बाजारात आली नाहीत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले असल्याचे विके्रते सत्तार शेख यांनी सांगितले.किराणा सामानाची दरवाढ तर चक्रावून सोडणारी आहे. महागाईने गोरगरिबांच्या घरी डाळ शिजणे अवघड होऊन बसले आहे. मसाला पदार्थांचे भाव स्थिर आहेत; परंतु फोडणीसाठी लागणाऱ्या तेलाच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशावर बोजा पडला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्रिकोणी कुटुंबाचा महिन्याचा किराणा माल साधारण दोन हजार रुपयांत येत होता. आता त्यासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. किराणा बजेटमध्येही आता जास्तीची तरतूद करण्याची वेळ आली आहे. उत्पन्न व खर्च याचे गणित जुळविताना चाकरमान्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरिबांची दमछाक चित्र आहे. (प्रतिनिधी)