शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

स्वस्त फक्त कांदे, बाकी वांधे !

By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST

बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे.

बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे. सततची भाववाढ व वाढत्या गरजा याचा मेळ घालताना महिला अक्षरश: मेटाकुटीला आल्या आहेत. किराणा सामान, भाजीपाला व फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. कांदे वगळता सध्या काहीच स्वस्त नाही. किचन बजेट कोलमडून पडल्याने सामान्यांच्या जगण्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.मागील सहा महिन्यांत किराणा सामानाच्या दरात होणाऱ्या वाढीला ‘ब्रेक’ तर बसलेलाच नाही; परंतु त्यात दिवसागणिक भर पडू लागली आहे. काही वस्तुंचे भाव तर दुप्पट झाले आहेत. उन्हाळयात कांद्याने सत्तरीचा दर पार केला होता. त्यामुळे ‘आम आदमी’च्या डोळ्यात पाणी आले होते. आता कांद्याचे दर १० रुपये किलोपर्यंत गडगडले आहेत. कांद्याला स्वस्ताई आली असली तरी मिरची, लसूण, टोमॅटो, बटाटे, कोबी, वांगे, लिंबू यांचे दर मात्र वाढतच आहेत. यंदा आतापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मात्र, काही पिके अद्याप बाजारात आली नाहीत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले असल्याचे विके्रते सत्तार शेख यांनी सांगितले.किराणा सामानाची दरवाढ तर चक्रावून सोडणारी आहे. महागाईने गोरगरिबांच्या घरी डाळ शिजणे अवघड होऊन बसले आहे. मसाला पदार्थांचे भाव स्थिर आहेत; परंतु फोडणीसाठी लागणाऱ्या तेलाच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशावर बोजा पडला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्रिकोणी कुटुंबाचा महिन्याचा किराणा माल साधारण दोन हजार रुपयांत येत होता. आता त्यासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. किराणा बजेटमध्येही आता जास्तीची तरतूद करण्याची वेळ आली आहे. उत्पन्न व खर्च याचे गणित जुळविताना चाकरमान्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरिबांची दमछाक चित्र आहे. (प्रतिनिधी)