शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

स्वस्त फक्त कांदे, बाकी वांधे !

By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST

बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे.

बीड : काटकसर करायची तरी किती? पोटमारा करुन कुढत जगायचं कसं? असा प्रश्न जिल्ह्यातील गृृहिणींना पडला आहे. सततची भाववाढ व वाढत्या गरजा याचा मेळ घालताना महिला अक्षरश: मेटाकुटीला आल्या आहेत. किराणा सामान, भाजीपाला व फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. कांदे वगळता सध्या काहीच स्वस्त नाही. किचन बजेट कोलमडून पडल्याने सामान्यांच्या जगण्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.मागील सहा महिन्यांत किराणा सामानाच्या दरात होणाऱ्या वाढीला ‘ब्रेक’ तर बसलेलाच नाही; परंतु त्यात दिवसागणिक भर पडू लागली आहे. काही वस्तुंचे भाव तर दुप्पट झाले आहेत. उन्हाळयात कांद्याने सत्तरीचा दर पार केला होता. त्यामुळे ‘आम आदमी’च्या डोळ्यात पाणी आले होते. आता कांद्याचे दर १० रुपये किलोपर्यंत गडगडले आहेत. कांद्याला स्वस्ताई आली असली तरी मिरची, लसूण, टोमॅटो, बटाटे, कोबी, वांगे, लिंबू यांचे दर मात्र वाढतच आहेत. यंदा आतापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. मात्र, काही पिके अद्याप बाजारात आली नाहीत. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले असल्याचे विके्रते सत्तार शेख यांनी सांगितले.किराणा सामानाची दरवाढ तर चक्रावून सोडणारी आहे. महागाईने गोरगरिबांच्या घरी डाळ शिजणे अवघड होऊन बसले आहे. मसाला पदार्थांचे भाव स्थिर आहेत; परंतु फोडणीसाठी लागणाऱ्या तेलाच्या दरवाढीने सामान्यांच्या खिशावर बोजा पडला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्रिकोणी कुटुंबाचा महिन्याचा किराणा माल साधारण दोन हजार रुपयांत येत होता. आता त्यासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. किराणा बजेटमध्येही आता जास्तीची तरतूद करण्याची वेळ आली आहे. उत्पन्न व खर्च याचे गणित जुळविताना चाकरमान्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरिबांची दमछाक चित्र आहे. (प्रतिनिधी)