शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उद्योग नगरी अस्वच्छ, उद्योजक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:49 IST

वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित बैठकीत उद्योनगरीतील अस्वच्छतेसंदर्भात उद्योजकांनी कचरा व्यवस्थापन करणाऱ्या  महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. 

वाळूज महानगरवाळूजच्या मसिआ सभागृहात शुक्रवारी आयोजित बैठकीत उद्योनगरीतील अस्वच्छतेसंदर्भात उद्योजकांनी कचरा व्यवस्थापन करणाऱ्या  महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उद्योगनगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी  महिंद्रा  कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले.

वाळूज औद्योगिक क्षेत्र व बजाजनगर येथील कचरा व्यवस्थापनाचे काम बीओटी तत्वावर इंदोरच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीला देण्यात आले आहे.  मात्र कंपनीकडून नियमितपणे औद्योगिक क्षेत्रातील केरकचरा उचलला जात नसल्यामुळे त्रस्त उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर एमआयडीसीचे मुख्य अभियंता शिवहरी दराडे व कार्यकारी अभियंता भुषण हर्षे यांनी उद्योजक व महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा  कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर बुधवारी (दि.७) मसिआच्या सभागृहात उद्योजक, एमआयडीसी व महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मसिआचे उपाध्यक्ष नारायण पवार, सचिव राहुल मोगले, एमआयडीसीचे सहा.अभियंता गणेश मुळीकर, सुधीर सुत्रावे, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे एस.सुंदरबाबु आदींची प्रमूख उपस्थिती होती.

उद्योगनगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीकडून लवकरच सर्व सेक्टरमध्ये कचरा उचलण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे कंपनीने एस. सुंदरबाबु यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात धोकादायक नसलेला कचरा दिवसाआड घंटागाडीद्वारे गोळा केला जाणार असून घंटागाडीच्या संख्येत वाढ करणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMIDCएमआयडीसीWalujवाळूजAurangabadऔरंगाबाद