शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

इंदूर स्वच्छ झाले; कारण टक्केवारी नव्हती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:24 IST

इंदूर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? : शहर स्वच्छतेच्या कामात आमच्याकडे टक्केवारीचा विषय कुठेच नव्हता, असे मत इंदूरच्या कचरा निर्मूलनाचे नियोजन करणाऱ्या ‘इको प्रो’ या एजन्सीचे प्रमुख अर्शद वारसी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देमागील दोन वर्षांमध्ये १५० कोटींची यंत्रणा खरेदी केली. कंपन्यांनी दर्जेदार काम करावे एवढीच अपेक्षा होती.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर शहर चकाचक झाले. त्याला उत्तम नियोजन, आयुक्त- महापौरांचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य ही गोष्ट ज्याप्रमाणे कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे कचऱ्यात अजिबात भ्रष्टाचार होणार नाही, याची घेतलेली काळजी हीदेखील महत्त्वाची ठरली. आमच्याकडे टक्केवारीचा विषय कुठेच नव्हता, असे मत इंदूरच्या कचरा निर्मूलनाचे नियोजन करणाऱ्या ‘इको प्रो’ या एजन्सीचे प्रमुख अर्शद वारसी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. मनपातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी आपला ‘इगो’ बाजूला ठेवावा हेसुद्धा निश्चित करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी पुरविली. 

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि आमच्यासारख्या खाजगी एजन्सींनीही शपथ घेतली की, कचऱ्यात अजिबात भ्रष्टाचार होणार नाही. मागील दोन वर्षांमध्ये १५० कोटींची यंत्रणा खरेदी केली. कंपन्यांनी दर्जेदार काम करावे एवढीच अपेक्षा होती. टक्केवारीच्या भानगडीत कुणी पडले नाही म्हणून हा ‘रिझल्ट’आला, असे वारसी म्हणाले. 

इंदूर शहराचा कायापालट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला आहे. ‘इको प्रो’ या खाजगी एजन्सीने शहर विकासाचे कागदावर नियोजन केले. याची शंभर टक्केअंमलबजावणी करण्याचे काम आयुक्त आणि महापौरांनी केले. योगायोग म्हणजे इंदूरचे नियोजन करणाऱ्या संस्थेलाच औरंगाबाद शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वर्षभरापूर्वी नेमलेले आहे.

इंदूर शहर स्वच्छ भारत अभियानात सलग दोन वर्षे प्रथम आले. महापालिकेने अल्पावधीत एवढे काम केले की, कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही. अशक्यप्राय असे काहीच नाही. प्रत्येक महापालिकेला हे करणे सहज शक्य आहे, असा संदेशही इंदूरने यानिमित्ताने दिला आहे. आधुनिक इंदूरच्या विकासात मोलाचा वाटा उचलण्याचे काम ‘इको प्रो’या एजन्सीने केले. 

९०० कचराकुंड्या अदृश्य झाल्याशहरातील ८५ वॉर्डांमध्ये ९०० कचराकुंड्या होत्या. प्रत्येक कचराकुंडीवर नेमका कचरा कोठून येतोय, याचा शोध घेण्यात आला. दोन वॉर्डातील कचराकुंड्या गायब केल्या. जेथे कचराकुंडी होती तेथे झाड लावले, रांगोळी काढली. एक व्यक्ती शिफ्टनुसार बसवून ठेवला. कोणी कचरा आणून टाकला तर तो परत उचलून त्याच्या घरासमोर नेऊन ठेवण्याचे काम तो कर्मचारी नम्रपणे करीत होता. तब्बल २० दिवस कुंडीच्या ठिकाणी कर्मचारी बसवून ठेवावे लागले. नागरिकांची सवय मोडली. सकाळी मनपाच्या वाहनात कचरा टाकण्याशिवाय पर्याय ठेवला नाही. दोन वॉर्डात हा प्रयोग केला. त्यानंतर १० वॉर्ड घेतले. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व वॉर्डातील कुंड्या गायब केल्या, असे वारसी यांनी सांगितले.

दोन तासांत तक्रारींचे निरसनमहापौरांच्या नावाने अ‍ॅप तयार केला. या अ‍ॅपवर नागरिकांना तक्रार करण्याची मुभा देण्यात आली. तक्रार येताच ती दोन तासांमध्ये दूर करण्यासाठी स्वतंत्र टीम नेमली. अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून तक्रारीनुसार काम झाले असे दबाव टाकून तर अ‍ॅपवर टाकत नाहीत ना, हे पाहण्यासाठी तिसरी यंत्रणा नेमली.

आजपासून तुम्हीच आयुक्त...स्वच्छता अभियान सुरू करण्यापूर्वी आयुक्त मनीष सिंह, ‘इको प्रो’चे अर्शद वारसी यांची बैठक झाली. बैठकीत वारसी यांनी सांगितले की, आम्ही सल्लागार आहोत. आम्ही आयुक्त नाही. दिलेल्या सल्ल्यानुसार शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे काम आयुक्तांचे आहे. यावर मनीष सिंह पटकन म्हणाले आजपासून तुम्हीच आयुक्त. तीन वर्षे आयुक्तांनी एकही निर्णय चुकीचा घेतला नाही, हे विशेष.

व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्थाशहरात व्यापारी वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा कचरा जमा करण्यात येतो. यासाठी लागणारे मनुष्यबळ वेगळे ठेवले. कचरा उचलण्यास जाण्यापूर्वी रिक्षा मनपाच्या यांत्रिकी विभागातच पूर्णपणे धुऊन जाते. मटन, मासे विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र वाहनांची नेमणूक केली आहे. बांधकाम साहित्य उचलणारी यंत्रणाही वेगळी केली.

उत्पन्नाच्या १५ टक्के खर्च करावादेशातील प्रत्येक महापालिकेने आपल्या उत्पन्नातील १५ टक्केरक्कम शहर स्वच्छतेवर खर्च करणे बंधनकारक आहे. इंदूर महापालिकेचा अर्थसंकल्प ४ हजार कोटींचा आहे. शहर स्वच्छतेवर मनपा फक्त ६ टक्के खर्च करीत आहे. सध्या १६५ कोटी रुपये कचऱ्यावर खर्च होतात.   

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका