शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र टिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:43 IST

सर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला

औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. यासाठी महापालिका प्रशासन पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली.अलीकडेच शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जय भवानीनगर, नूर कॉलनीसह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत औरंगाबाद महापालिकेची प्रमुख म्हणून निवड केली आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आली आहे.बारवाल यांनी शहरातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काय करता येईल, यासाठी सोमवारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपयुक्त रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजय चौधरी उपस्थित होते. पोलीस विभागातील अपुºया मनुष्यबळावर मात करण्यासाठी आयुक्त यशस्वी यादव यांनी नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आपत्ती व्यवस्थापनासाठीदेखील नागरिकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन टीम तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.आपत्ती निवारण दिवस१३ आॅक्टोबर हा आपत्ती व्यवस्थापन धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार ९ ते १३ आॅक्टोबरदरम्यान आपत्तीविषयक रंगीत तालीम घेऊन नागरिकांना माहिती देण्यात येईल. महापालिका, खासगी शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्याचा निर्णय यावेळी झाला.