शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र टिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:43 IST

सर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला

औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. यासाठी महापालिका प्रशासन पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली.अलीकडेच शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जय भवानीनगर, नूर कॉलनीसह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत औरंगाबाद महापालिकेची प्रमुख म्हणून निवड केली आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आली आहे.बारवाल यांनी शहरातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काय करता येईल, यासाठी सोमवारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपयुक्त रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजय चौधरी उपस्थित होते. पोलीस विभागातील अपुºया मनुष्यबळावर मात करण्यासाठी आयुक्त यशस्वी यादव यांनी नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आपत्ती व्यवस्थापनासाठीदेखील नागरिकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन टीम तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.आपत्ती निवारण दिवस१३ आॅक्टोबर हा आपत्ती व्यवस्थापन धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार ९ ते १३ आॅक्टोबरदरम्यान आपत्तीविषयक रंगीत तालीम घेऊन नागरिकांना माहिती देण्यात येईल. महापालिका, खासगी शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्याचा निर्णय यावेळी झाला.