शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हमीभाव व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गहू, उडीद व हरभरा डाळीच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:53 IST

केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देचालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल भाव परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले.

औरंगाबाद : केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ व हरभरा डाळीच्या भावात वाढ झाली आहे.

चालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (एमएसपी) देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय मागील महिन्यात केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले. केंद्र सरकारकडे तूर व हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र, मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भाववाढीत आणखी भर पडली आहे. आता हळूहळू जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू लागले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत २०० रुपयांनी महागून हरभरा डाळ ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. मराठवाड्यात तूर, मूग व उडदाचा पेरा चांगला झाला आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने सध्या पिकाबदल शाश्वती देता येत नाही. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यामुळे २०० ते ३०० रुपयांनी वधारून तूर डाळ ५४०० ते ६००० रुपये, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये, उडीद डाळ ४६०० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. आता हमीभाव वाढल्याने शेतकरी खरिपातील मूग, तूर, उडीद कमी भावात विक्री करणार नाही. त्यात दुष्काळाच्या परिस्थितीने स्थानिकमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते; पण परराज्यात चांगला पाऊस झाला आहे. तेथील उत्पादनावर येथील डाळीच्या किमतीचे भविष्य ठरेल, अशी माहिती डाळीचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. येथील दुष्काळसदृश परिस्थिती आणखी १० दिवस अशीच राहिली व सरकारने गोदामातील तूर व हरभरा बाहेर आणला नाही, तर सणासुदीत भाववाढ होऊ शकते. गव्हापाठोपाठ ज्वारी, बाजारीत वाढ गव्हाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, मध्यप्रदेश सरकारने बोनससह हमीभाव १९५० रुपये प्रतिक्विंटल देऊन शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केला. परिणामी, २०० ते ३०० रुपयांनी गव्हाचे भाव वधारून सध्या २४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. त्यापाठोपाठ भाववाढ होऊन ज्वारी २२०० ते २६०० रुपये, तर बाजरीचा भाव १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

 

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार