शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गहू, उडीद व हरभरा डाळीच्या भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:53 IST

केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देचालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल भाव परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले.

औरंगाबाद : केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ व हरभरा डाळीच्या भावात वाढ झाली आहे.

चालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (एमएसपी) देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय मागील महिन्यात केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले. केंद्र सरकारकडे तूर व हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र, मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भाववाढीत आणखी भर पडली आहे. आता हळूहळू जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू लागले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत २०० रुपयांनी महागून हरभरा डाळ ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. मराठवाड्यात तूर, मूग व उडदाचा पेरा चांगला झाला आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने सध्या पिकाबदल शाश्वती देता येत नाही. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यामुळे २०० ते ३०० रुपयांनी वधारून तूर डाळ ५४०० ते ६००० रुपये, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये, उडीद डाळ ४६०० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. आता हमीभाव वाढल्याने शेतकरी खरिपातील मूग, तूर, उडीद कमी भावात विक्री करणार नाही. त्यात दुष्काळाच्या परिस्थितीने स्थानिकमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते; पण परराज्यात चांगला पाऊस झाला आहे. तेथील उत्पादनावर येथील डाळीच्या किमतीचे भविष्य ठरेल, अशी माहिती डाळीचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. येथील दुष्काळसदृश परिस्थिती आणखी १० दिवस अशीच राहिली व सरकारने गोदामातील तूर व हरभरा बाहेर आणला नाही, तर सणासुदीत भाववाढ होऊ शकते. गव्हापाठोपाठ ज्वारी, बाजारीत वाढ गव्हाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, मध्यप्रदेश सरकारने बोनससह हमीभाव १९५० रुपये प्रतिक्विंटल देऊन शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केला. परिणामी, २०० ते ३०० रुपयांनी गव्हाचे भाव वधारून सध्या २४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. त्यापाठोपाठ भाववाढ होऊन ज्वारी २२०० ते २६०० रुपये, तर बाजरीचा भाव १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

 

टॅग्स :MarketबाजारAgriculture Sectorशेती क्षेत्रGovernmentसरकार