शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पासपोर्ट काढण्यासाठी ओघ वाढला; अर्ज केलाय तर दीड महिना थांबा...

By साहेबराव हिवराळे | Updated: April 21, 2023 15:33 IST

दिवसाला फक्त ८० जणांच्याच होतात मुलाखती; अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढली

छत्रपती संभाजीनगर :पासपोर्ट नोंदणीनंतर दररोज ऑनलाइन मुलाखतीसाठी ८० अर्जदारांच्याच मुलाखती होत आहेत. विलंब झाला की, पुन्हा पुढच्या तारखेची ऑनलाइन तारीख तुमच्या मोबाइलवर कळविली जाते. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. टपाल कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, त्यास पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला; परंतु सेवासुविधांत भर पडलेली नाही.

वर्षभरात १३ हजारांवर नागरिकांना पासपोर्ट देण्यात आला आहे. शहरात व्यापार तसेच पर्यटनाच्या वाढत्या सफरीमुळे पासपोर्ट अपडेट करणे किंवा नवीन काढण्यात पालकांसह विद्यार्थीही अग्रेसर आहेत. अनेकांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी येत असल्याने ऑनलाइन अर्ज करून पासपोर्ट काढण्याच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.

स्वत:च भरा अर्ज आणि मिळवा पासपोर्ट‘तात्काळ’साठी वेगळे शुल्क भरावे लागत असून, अर्ज करताना संगणकाच्या स्क्रीनवर कागदपत्रांची यादी येते, त्याची पूर्तता केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नाही. संगणकावर अर्ज केल्यावर पासपोर्टची ऑनलाइन मुलाखतीची दिनांक व वेळ मोबाइलवर कळवली जाते. त्या ठरलेल्या दिवशीच व वेळेवर दाखल केलेल्या कागदपत्रासह कार्यालयात दाखल होणे गरजेचे आहे. मुलाखत झाल्यावर पोलिसांकडून पडताळणीदेखील होते आणि त्यानंतर आठ ते पंधरा दिवसांत पासपोर्ट घरपोच येतो; परंतु अधिकाऱ्यांसमोर मुलाखतीची प्रतीक्षा यादी वाढलेली आहे.

विलंब कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुपासपोर्ट लवकर मिळण्यासाठी इतरही जिल्ह्यांतील नागरिक ऑनलाइन अर्ज करून येथे सेवाकेंद्राचे नामनिर्देश करतात. त्यामुळे ‘वेटिंग’ वाढलेले आहे. अन्यथा छत्रपती संभाजीनगरवासीयांना आठ ते पंधरा दिवसांतच पासपोर्ट पाठविला जातो. पोस्टाचेही कर्मचारी मदतीला आहेत. विलंब कसा कमी होईल, याचा वरिष्ठांशी बोलून निर्णय घेता येईल.- अशोक धनवडे, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट