शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पक्षाची ताकद वाढवा, रिपाई महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 13:28 IST

Ramdas Athwale: वाॅर्डा-वाॅर्डांत, गावा-गावांत पक्ष मजबूत करण्यासाठी जनसंपर्क वाढवावा.

औरंगाबाद : आगामी जि. प., पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका भाजपसोबत युतीमध्ये लढल्या जातील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी इतर समाजाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करावा. भाजपचे (BJP) निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत नियमित चर्चा करावी, अशा सूचना रिपाइंचे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale ) यांनी बुधवारी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या.

मराठवाडा पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी खडकेश्वर येथे झाली. अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम होते. या बैठकीस मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, विजय सोनवणे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, डी. एम. दाभाडे, संजय बनसोडे, परमेश्वर साळवे, राजाभाऊ ओहोळ, मिलिंद शिरढोणकर, दिवाकर माने, डॉ. विजय गायकवाड, अरविंद अवचरमल, संजय ठोकळ, नागराज गायकवाड आदींसह सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आठवले म्हणाले, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका भाजसोबत युती करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पूर्ण ताकदीने लढणार आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. वाॅर्डा-वाॅर्डांत, गावा-गावांत पक्ष मजबूत करण्यासाठी जनसंपर्क वाढवावा. लोकांची कामे करा. लोकांना विश्वास देऊन बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्षवाढीच्या दृष्टीने काम करावे. भाजपचे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांसोबत नियमित चर्चा करावी. त्यांना निवडून येणारी गावे, वाॅर्ड, गट, गणांच्या याद्या द्याव्यात. बैठकीचे सूत्रसंचालक दिलीप पाडमुख यांनी केले, तर शहराध्यक्ष किशोर थोरात यांनी आभार मानले. यावेळी बाळकृष्ण इंगळे, प्रशांत शेगावकर, मधुकर चव्हाण, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण हिरावळे, विजय मगरे यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

लवकरच जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्तयेत्या दोन महिन्यांत मराठवाड्यातील सर्व जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी तयार केल्या जातील. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. सर्वसमावेशक पक्ष तयार करण्यासाठी इतर समाजाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, ‘एकच लक्ष, रिपब्लिकन पक्ष’ या घोषणेनुसार सदस्यता नोंदणी पूर्ण करावी. सदस्य नोंदणीची पावतीपुस्तके राज्य कार्यालयात जमा करावीत. सदस्य नोंदणीचा आढावा घेतल्यानंतरच उमेदवारी व कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना रामदास आठवले यांनी बैठकीत दिल्या.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद