शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ; परीक्षा केंद्रांची होणार फेरमांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:06 IST

दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे.

औरंगाबाद : दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने हाती घेतल्याची माहिती सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. यात परीक्षा केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया दहावी-बारावी बोर्ड परीक्षांना फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये सुरुवात होणार आहे. दरवर्षी विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. यंदाही मागील वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी विद्यार्थी संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये परीक्षा देणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८९ हजार ९९१ आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजार २१५ आहे. या अर्जांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असेही पुन्ने यांनी सांगितले. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढते आहे. मात्र, त्या तुलनेत असणारी चांगली आणि सुविधा देणाºया परीक्षा केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर होणारी गैरसोय, पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांना खाली बसवणे, बाकडे नसणे आदी विविध समस्या आढळून येतात. असे प्रकार वारंवार होत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय बोर्डाच्याही कामकाजावर शंका उपस्थित होते. त्यामुळे सुविधा नसतानाही परीक्षा केंद्र स्वीकारणाºया शाळा-महाविद्यालयांची पाहणी केल्यानंतर परीक्षा केंद्र देण्याबरोबरच आता नव्याने परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. शिवाय परीक्षा केंद्र असलेल्या शाळा- महाविद्यालयांमध्ये सुविधा आहेत की नाही, यासंबंधी माहितीदेखील मागविण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद