शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

दहावी, बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ; परीक्षा केंद्रांची होणार फेरमांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:06 IST

दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे.

औरंगाबाद : दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने हाती घेतल्याची माहिती सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. यात परीक्षा केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया दहावी-बारावी बोर्ड परीक्षांना फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये सुरुवात होणार आहे. दरवर्षी विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. यंदाही मागील वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी विद्यार्थी संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये परीक्षा देणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८९ हजार ९९१ आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजार २१५ आहे. या अर्जांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असेही पुन्ने यांनी सांगितले. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढते आहे. मात्र, त्या तुलनेत असणारी चांगली आणि सुविधा देणाºया परीक्षा केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर होणारी गैरसोय, पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांना खाली बसवणे, बाकडे नसणे आदी विविध समस्या आढळून येतात. असे प्रकार वारंवार होत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय बोर्डाच्याही कामकाजावर शंका उपस्थित होते. त्यामुळे सुविधा नसतानाही परीक्षा केंद्र स्वीकारणाºया शाळा-महाविद्यालयांची पाहणी केल्यानंतर परीक्षा केंद्र देण्याबरोबरच आता नव्याने परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. शिवाय परीक्षा केंद्र असलेल्या शाळा- महाविद्यालयांमध्ये सुविधा आहेत की नाही, यासंबंधी माहितीदेखील मागविण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद