शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:47 IST

एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरातील वस्त्यांमध्येही साप आढळत आहेत. सापाने चावा घेतल्याच्या घटनाही समोर येत आहेत. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

ग्रामीण भागात सापांचा वावर नवीन नाही. शेतात तसेच झुडुपांमध्ये साप हमखास असतातच. पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी गेल्याने ते बाहेर येतात आणि घरातील अडगळीच्या जागेत, जिन्याखाली दबा धरून बसतात. घरात झाडांच्या कुंड्या असतात. त्या दाटीवाटीने न ठेवता अंतरावर ठेवाव्यात. कारण, त्याच्या आडोशाला साप येऊन मुक्काम ठोकू शकतो. त्यामुळे अशा जागांकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक जण साप पकडण्याचा प्रयत्न करतात; परंतु असे धाडस जिवावर बेतू शकते.

३० जणांना चावला विंचूसर्पदंशाबरोबर विंचू चावण्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत. सापांबरोबरच विंचूचा दंशही घातक समजला जातो. गेल्या अडीच महिन्यांत ३० जणांना विंचू चावला.

घाटी रुग्णालयात उपचारजिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात येतात. यात सर्पदंश, विंचू दंशाचेही रुग्ण घाटीत येतात. गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या २७० रुग्णांनी येथे उपचार घेतले.

साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?साप चावल्यानंतर सुरुवातीचा एक तास तो रुग्णासाठी वेदनादायक असतो. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्या व्यक्तीला धीर द्यावा, अति चालणे, बोलणे टाळावे. जखम अगोदर जंतुनाशकाने, पाण्याने स्वच्छ करावी. स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णास तत्काळ उपचारासाठी न्यावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडून उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

विंचू चावला तर...विंचू चावला तर कोणत्याही घरगुती उपचारापेक्षा वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. आपल्याकडे काळा आणि लाल हे दोन प्रकारचे विंचू आढळून येतात. काळ्या विंचूचा दंश झाला तर असह्य वेदना होतात. मात्र, त्याने मृत्यू ओढवत नाही. उपचाराअंती या वेदना शमतात. लाल विंचवाचा दंश जीवघेणा ठरू शकतो. या विंचूला घातक समजले जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsnakeसाप