शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:47 IST

एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरातील वस्त्यांमध्येही साप आढळत आहेत. सापाने चावा घेतल्याच्या घटनाही समोर येत आहेत. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

ग्रामीण भागात सापांचा वावर नवीन नाही. शेतात तसेच झुडुपांमध्ये साप हमखास असतातच. पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी गेल्याने ते बाहेर येतात आणि घरातील अडगळीच्या जागेत, जिन्याखाली दबा धरून बसतात. घरात झाडांच्या कुंड्या असतात. त्या दाटीवाटीने न ठेवता अंतरावर ठेवाव्यात. कारण, त्याच्या आडोशाला साप येऊन मुक्काम ठोकू शकतो. त्यामुळे अशा जागांकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक जण साप पकडण्याचा प्रयत्न करतात; परंतु असे धाडस जिवावर बेतू शकते.

३० जणांना चावला विंचूसर्पदंशाबरोबर विंचू चावण्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत. सापांबरोबरच विंचूचा दंशही घातक समजला जातो. गेल्या अडीच महिन्यांत ३० जणांना विंचू चावला.

घाटी रुग्णालयात उपचारजिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात येतात. यात सर्पदंश, विंचू दंशाचेही रुग्ण घाटीत येतात. गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या २७० रुग्णांनी येथे उपचार घेतले.

साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?साप चावल्यानंतर सुरुवातीचा एक तास तो रुग्णासाठी वेदनादायक असतो. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्या व्यक्तीला धीर द्यावा, अति चालणे, बोलणे टाळावे. जखम अगोदर जंतुनाशकाने, पाण्याने स्वच्छ करावी. स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णास तत्काळ उपचारासाठी न्यावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडून उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

विंचू चावला तर...विंचू चावला तर कोणत्याही घरगुती उपचारापेक्षा वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. आपल्याकडे काळा आणि लाल हे दोन प्रकारचे विंचू आढळून येतात. काळ्या विंचूचा दंश झाला तर असह्य वेदना होतात. मात्र, त्याने मृत्यू ओढवत नाही. उपचाराअंती या वेदना शमतात. लाल विंचवाचा दंश जीवघेणा ठरू शकतो. या विंचूला घातक समजले जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsnakeसाप