शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:47 IST

एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरातील वस्त्यांमध्येही साप आढळत आहेत. सापाने चावा घेतल्याच्या घटनाही समोर येत आहेत. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

ग्रामीण भागात सापांचा वावर नवीन नाही. शेतात तसेच झुडुपांमध्ये साप हमखास असतातच. पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी गेल्याने ते बाहेर येतात आणि घरातील अडगळीच्या जागेत, जिन्याखाली दबा धरून बसतात. घरात झाडांच्या कुंड्या असतात. त्या दाटीवाटीने न ठेवता अंतरावर ठेवाव्यात. कारण, त्याच्या आडोशाला साप येऊन मुक्काम ठोकू शकतो. त्यामुळे अशा जागांकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक जण साप पकडण्याचा प्रयत्न करतात; परंतु असे धाडस जिवावर बेतू शकते.

३० जणांना चावला विंचूसर्पदंशाबरोबर विंचू चावण्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत. सापांबरोबरच विंचूचा दंशही घातक समजला जातो. गेल्या अडीच महिन्यांत ३० जणांना विंचू चावला.

घाटी रुग्णालयात उपचारजिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात येतात. यात सर्पदंश, विंचू दंशाचेही रुग्ण घाटीत येतात. गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या २७० रुग्णांनी येथे उपचार घेतले.

साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?साप चावल्यानंतर सुरुवातीचा एक तास तो रुग्णासाठी वेदनादायक असतो. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्या व्यक्तीला धीर द्यावा, अति चालणे, बोलणे टाळावे. जखम अगोदर जंतुनाशकाने, पाण्याने स्वच्छ करावी. स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णास तत्काळ उपचारासाठी न्यावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडून उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

विंचू चावला तर...विंचू चावला तर कोणत्याही घरगुती उपचारापेक्षा वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. आपल्याकडे काळा आणि लाल हे दोन प्रकारचे विंचू आढळून येतात. काळ्या विंचूचा दंश झाला तर असह्य वेदना होतात. मात्र, त्याने मृत्यू ओढवत नाही. उपचाराअंती या वेदना शमतात. लाल विंचवाचा दंश जीवघेणा ठरू शकतो. या विंचूला घातक समजले जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsnakeसाप