शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तपासात मनपाचे असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:22 IST

महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़परभणी महानगरपालिकेने वीज वितरण कंपनीकडून पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या घेतल्या आहेत़ पथदिव्यांच्या बिलाचा भरणा प्रत्येक महिन्याला महावितरणकडे आरटीजीएस पद्धतीने केला जातो़ मात्र या प्रकारात महापालिकेच्या पैशातून खाजगी व्यक्तींचे वीज बिल भरले जात असल्याची बाब उघड झाली़ २७ सप्टेंबर रोजी हा प्रकार निदर्शनास आला़ त्यानंतर महावितरण कंपनीने कोतवाली पोलीस ठाण्यात मनपाचे सहाय्यक अ़ जावेद अ़ शकूर आणि महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला़ प्रारंभीच्या माहितीनुसार ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक झाली असून, हे सर्व पैसे महापालिकेचे असल्याने मनपाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना मनपाचेच तपासाला असहकार्य होत असल्याचे समोर येत आहे़जून २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महापालिकेने वीज बिलापोटी ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये महावितरणने दिले़ त्यापैकी ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांच्या रकमेतून ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली होती़ याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी संभाजी मालकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येवून जवळपास एक महिन्याचा कालवधी होत आहे़ या संपूर्ण काळात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ तसेच या प्रकरणामध्ये संबंधितांची चौकशीही झाली नाही़ महानगरपालिका पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ मध्यंतरी दिवाळीचा कालावधी असल्याने प्रकरण थंड बस्त्स्यात पडले होते़ परंतु, त्यानंतरही तपासात प्रगती नसल्याचे दिसत आहे़ महापालिकेच्या मालकीच्या पैशांचा गैरव्यवहार झाला असल्याने मनपातील अधिकाºयांनी स्वत:हून पुढे येऊन तपासाला गती देणे आवश्यक आहे़ परंतु, मनपातील अधिकारी या प्रकरणाविषयी बोलायलाही तयार नाहीत़ त्यामुळे तपासाला गती मिळत नाही़या प्रकरणात महानगरपालिकेने चौकशी समिती स्थापन केली़ परंतु, चौकशी समितीनेही अद्याप आपला स्पष्ट अहवाल दिलेला नाही़ त्यामुळे एक महिन्यापासून या गैरव्यवहार प्रकरणातील तपासाला गती मिळत नसल्याचेच दिसत आहे़