शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

तपासात मनपाचे असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:22 IST

महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़परभणी महानगरपालिकेने वीज वितरण कंपनीकडून पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या घेतल्या आहेत़ पथदिव्यांच्या बिलाचा भरणा प्रत्येक महिन्याला महावितरणकडे आरटीजीएस पद्धतीने केला जातो़ मात्र या प्रकारात महापालिकेच्या पैशातून खाजगी व्यक्तींचे वीज बिल भरले जात असल्याची बाब उघड झाली़ २७ सप्टेंबर रोजी हा प्रकार निदर्शनास आला़ त्यानंतर महावितरण कंपनीने कोतवाली पोलीस ठाण्यात मनपाचे सहाय्यक अ़ जावेद अ़ शकूर आणि महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला़ प्रारंभीच्या माहितीनुसार ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक झाली असून, हे सर्व पैसे महापालिकेचे असल्याने मनपाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना मनपाचेच तपासाला असहकार्य होत असल्याचे समोर येत आहे़जून २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महापालिकेने वीज बिलापोटी ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये महावितरणने दिले़ त्यापैकी ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांच्या रकमेतून ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली होती़ याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी संभाजी मालकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येवून जवळपास एक महिन्याचा कालवधी होत आहे़ या संपूर्ण काळात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ तसेच या प्रकरणामध्ये संबंधितांची चौकशीही झाली नाही़ महानगरपालिका पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ मध्यंतरी दिवाळीचा कालावधी असल्याने प्रकरण थंड बस्त्स्यात पडले होते़ परंतु, त्यानंतरही तपासात प्रगती नसल्याचे दिसत आहे़ महापालिकेच्या मालकीच्या पैशांचा गैरव्यवहार झाला असल्याने मनपातील अधिकाºयांनी स्वत:हून पुढे येऊन तपासाला गती देणे आवश्यक आहे़ परंतु, मनपातील अधिकारी या प्रकरणाविषयी बोलायलाही तयार नाहीत़ त्यामुळे तपासाला गती मिळत नाही़या प्रकरणात महानगरपालिकेने चौकशी समिती स्थापन केली़ परंतु, चौकशी समितीनेही अद्याप आपला स्पष्ट अहवाल दिलेला नाही़ त्यामुळे एक महिन्यापासून या गैरव्यवहार प्रकरणातील तपासाला गती मिळत नसल्याचेच दिसत आहे़