शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करा

By admin | Updated: July 24, 2014 00:22 IST

परभणी : विकासापासून दूर असलेल्या राज्यातील बंजारा समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून केली जात आहे़

परभणी : विकासापासून दूर असलेल्या राज्यातील बंजारा समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून केली जात आहे़ परंतु, शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, समाजाचा विकास साधण्यासाठी अनुसूचित जातीत समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ भारतीय बंजारा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन पाठवून राज्यातील समाजाची स्थिती आणि विकासापासून हा समाज कसा दूर आहे, याविषयीची माहिती दिली आहे़ भारतीय बंजारा परिषदेचे गोपीनाथ राठोड यांच्यासह समाज बांधवांनी हे निवेदन पाठविले आहे़ बंजारा समाजातील प्रतिनिधीला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दोन वेळा संधी मिळाली़ परंतु, हा समाज अजूनही विकासापासून दूर आहे़ प्रामुख्याने तांड्यांवर राहणारा हा समाज ऊस तोड, विहीर खोदने, रस्त्याची कामे अशी कष्टाची कामे करतो. समाजातील मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे़ हा समाज राज्यभर विखुरलेला असून, समाजाची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे़ परंतु, नोकरीत आरक्षण १ टक्क्यापेक्षाही कमी आहे़ महाराष्ट्र शासनाने विमुक्त जातीच्या नावाखाली ३ टक्के सवलत दिली़ परंतु, त्यात १४ जातींचा समावेश आहे़ त्यामुळे राज्यात या समाजावर अन्याय होणार आहे़ बंजारा समाज तांड्यांवर तर आदिवासी समाज पाड्यावर राहतो़ या दोन्ही समाजाच्या जीवनशैलीत साम्य आहे़ परंतु, आदिवासी समाजाला दिलेल्या सवलतींमुळे हा समाज विकासाच्या दिशेने जात आहे़ परंतु, बंजारा समाजाचा विकास मात्र ठप्प आहे़ महाराष्ट्र वगळता आंध्र आणि इतर राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळतात़ त्यामुळे आंध्राच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही बंजारा समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात असा ठराव केंद्राकडे पाठविल्यास न्याय मिळू शकतो़ परंतु, याप्रश्नी अजूनही विचार झालेला नाही़ समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधानसभेत ठराव पारित करावा व समाजाच्या विकासाला हातभार लावावा, अशी मागणी गोपीनाथ राठोड यांच्यासह शिवराम जाधव, शंकर पवार, गोविंद पवार, राजेश पवार, सुदाम राठोड, प्रेमदास राठोड, लखन चव्हाण, रोहन राठोड, शंकर जाधव, एम़ एल़ जाधव आदींनी केली आहे़ (प्रतिनिधी)शासनाच्या योजना मिळेनाततांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाला अनेक असुविधांचा सामना करावा लागतो़ तांड्याला जायला रस्ता नाही़ तांड्यावर वीज नाही, शाळा, रेशन कार्ड, निराधारांचे पगार आदी सवलती तांड्यांवर मिळत नाहीत़ ९९ टक्के तांड्यांवर स्वस्त धान्य दुकान नाही़ त्यामुळे शासनाचे रॉकेल या समाजाला माहितच नाही़ हा समाज विकासापासून दूर राहिला असून, यासंदर्भात विचार व्हावा, अशी मागणी आहे़