शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात

By admin | Updated: March 3, 2015 00:30 IST

गणेश खेडकर , औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून खरीप पिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप झालेले नाही तोच रबीही हातची जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. सतत येणाऱ्या

गणेश खेडकर , औरंगाबादजिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून खरीप पिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप झालेले नाही तोच रबीही हातची जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. सतत येणाऱ्या या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. काही भागांमध्ये रविवारी रात्रीही या बेमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. खरीप पिके हातची गेली म्हणून शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात याचे वाटप अतिशय संथगतीने सुरू आहे.जिल्ह्यात तब्बल ३५ कोटींचे दुष्काळी अनुदान अजून वाटप झालेले नाही. औरंगाबाद तालुक्याला २४ कोटी ६ लाख १८ हजार ३३६ रुपये मिळाले. त्यापैकी गेल्या आठवड्यापर्यंत १५ कोटी ९६ लाख ३२ हजार ४५५ रुपये वाटप झाले होते. कन्नड तालुक्यात ७५ हजार १८६ अल्पभूधारक शेतकरी असून ११ हजार ८७६ बहुभूधारक शेतकऱ्यांची संख्या आहे. या तालुक्याने ३७ कोटींची मागणी केली असून, आतापर्यंत २९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी २२ कोटींचे वाटप झाले, तर ७ कोटी शिल्लक आहेत. ४९ हजार ७५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे वाटप झाले आहेत. म्हणजे अजूनही २५ हजार शेतकऱ्यांना निधीचे वाटप झालेले नाही. सिल्लोड तालुक्यात एकूण ७४ हजार शेतकरी आहेत. आतापर्यंत २७ कोटींचे अनुदान आले. त्यापैकी ५५ हजार शेतकऱ्यांना २५ कोटी ५० लाख रुपये वाटप झाले आहेत. सोमवारी एक कोटी वाटप करण्यात येतील. उर्वरित रक्कम मंगळवारी वाटप केली जाईल, असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले. सोयगाव तालुक्यात जवळपास एक हजार शेतकऱ्यांना अजून अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. सोयगावच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतरही सर्व शेतकऱ्यांच्या याद्या अजूनही अपडेट झालेल्या नाहीत. येथे दीड ते दोन कोटी रुपये पडून आहेत. पैठण तालुक्याला आतापर्यंत ३८ कोटी ११ लाख १४ हजार ७९६ रुपये अनुदान मिळाले असून, ३३ कोटी रुपये वाटप करण्यात आले. येथे अजून ५ कोटी रुपयांचा निधी पडून आहे.