शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात

By admin | Updated: March 3, 2015 00:30 IST

गणेश खेडकर , औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून खरीप पिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप झालेले नाही तोच रबीही हातची जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. सतत येणाऱ्या

गणेश खेडकर , औरंगाबादजिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून खरीप पिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप झालेले नाही तोच रबीही हातची जाण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. सतत येणाऱ्या या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. काही भागांमध्ये रविवारी रात्रीही या बेमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. खरीप पिके हातची गेली म्हणून शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात याचे वाटप अतिशय संथगतीने सुरू आहे.जिल्ह्यात तब्बल ३५ कोटींचे दुष्काळी अनुदान अजून वाटप झालेले नाही. औरंगाबाद तालुक्याला २४ कोटी ६ लाख १८ हजार ३३६ रुपये मिळाले. त्यापैकी गेल्या आठवड्यापर्यंत १५ कोटी ९६ लाख ३२ हजार ४५५ रुपये वाटप झाले होते. कन्नड तालुक्यात ७५ हजार १८६ अल्पभूधारक शेतकरी असून ११ हजार ८७६ बहुभूधारक शेतकऱ्यांची संख्या आहे. या तालुक्याने ३७ कोटींची मागणी केली असून, आतापर्यंत २९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी २२ कोटींचे वाटप झाले, तर ७ कोटी शिल्लक आहेत. ४९ हजार ७५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे वाटप झाले आहेत. म्हणजे अजूनही २५ हजार शेतकऱ्यांना निधीचे वाटप झालेले नाही. सिल्लोड तालुक्यात एकूण ७४ हजार शेतकरी आहेत. आतापर्यंत २७ कोटींचे अनुदान आले. त्यापैकी ५५ हजार शेतकऱ्यांना २५ कोटी ५० लाख रुपये वाटप झाले आहेत. सोमवारी एक कोटी वाटप करण्यात येतील. उर्वरित रक्कम मंगळवारी वाटप केली जाईल, असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले. सोयगाव तालुक्यात जवळपास एक हजार शेतकऱ्यांना अजून अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. सोयगावच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतरही सर्व शेतकऱ्यांच्या याद्या अजूनही अपडेट झालेल्या नाहीत. येथे दीड ते दोन कोटी रुपये पडून आहेत. पैठण तालुक्याला आतापर्यंत ३८ कोटी ११ लाख १४ हजार ७९६ रुपये अनुदान मिळाले असून, ३३ कोटी रुपये वाटप करण्यात आले. येथे अजून ५ कोटी रुपयांचा निधी पडून आहे.