शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
6
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
7
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
8
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
9
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
10
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
11
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
12
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
13
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
14
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
15
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
16
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
17
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
18
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा

आयुष्याच्या सायंकाळी लाखभर वृद्ध शिकले लेखन- वाचन; नवभारत साक्षरता अभियानास प्रतिसाद

By राम शिनगारे | Updated: May 16, 2024 14:35 IST

परीक्षेचा निकाल जाहीर, ९ हजार ४१२ वृद्धांना सुधारणा करावी लागणार

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात राबविण्यात आलेल्या उल्लास-नवभारत साक्षरता अभियानात ६६ वर्षांवरील तब्बल ९६ हजार ५१८ जण साक्षर बनले आहेत. मागील शैक्षणिक सत्रापासून सुरू केलेल्या या अभियानात निरक्षरांना शिकविल्यानंतर साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात ६६ वर्षांवरील ९६ हजार ५१७ जण उत्तीर्ण झाले आहेत तर ९ हजार ४१२ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा मिळाला आहे.

केंद्र सरकारने देशभरात उल्लास- नवभारत साक्षरता अभियान २०२२-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला राज्यभरातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार संबंधितांना साक्षर करण्यासाठी अध्यापन केले. वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर निरक्षरांची १७ मार्चला उत्तीर्णतेची चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ५९ हजार ५३३ असाक्षरांनी नोंदणी केली होती. त्यातील ४ लाख २५ हजार ९०६ जण उत्तीर्ण झाले आहेत तर ३३ हजार ६२७ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा मिळाला. ४ लाख ४९ हजार ५३३ परीक्षार्थींमध्ये १ लाख ५ हजार ९३० परीक्षार्थींचे वय ६६ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यात ९६ हजार ५१८ निरक्षर या परीक्षेनंतर साक्षर बनल्याचे स्पष्ट झाले. विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या निरक्षर व्यक्तींना साक्षर बनविण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेनुसार राज्यभरात २०२७ पर्यंत १०० टक्के नागरिकांना साक्षर बनविण्याचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण संचालनालय योजना विभाग कार्य करीत आहे.

अक्षर ओळख, स्वाक्षरीची आवश्यकतानिरक्षरांना साक्षर बनविण्याच्या मोहिमेमागे निरक्षर असलेल्या व्यक्तींना किमान अक्षरांची ओळख होणे, स्वत:ची स्वाक्षरी करता यावी, ई-मेल करणे, एटीएममधून पैसे काढणे आणि भरता यावेत, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साक्षरतेसह डिजिटल साक्षरतेला यातून प्राधान्य देण्यात आले आहे.

स्त्रियांची संख्या सर्वांधिकराज्यात नवसाक्षरता अभियानात सर्वाधिक नोंदणी स्त्रियांनी केली होती. उल्लास ॲपवर १ लाख ८८ हजार ६२८ पुरुषांनी तर ४ लाख ५३ हजार ५९ स्त्रियांनी साक्षरतेसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार परीक्षा दिलेल्यांमध्ये पुरुषांची संख्या १ लाख ३९ हजार ५८२ एवढी होती तर ३ लाख १९ हजार ९४५ स्त्रियांनी साक्षरतेची परीक्षा दिली असल्याचेही शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाने जाहीर केले आहे.

साक्षरता अभियानाची राज्यातील आकडेवारी

वयोगट...................उल्लास ॲपवर एकूण नोंदणी..................परीक्षार्थी.............उत्तीर्ण..............सुधारणा आवश्यक........उत्तीर्ण टक्केवारी

१५ ते ३५ वर्ष.....................१,१३,११०.....................................८०,६१६..............७७,६३४..................२९८२........................९६.३०

३६ ते ६५ वर्ष....................३,८६,१८२....................................२,७२,९८७...........२,५१,७५४...............२१,२३३....................९२.२२

६६ वर्षावरील...................१,४२,५२६.....................................१,०५,९३०..............९६,५१८..................९४१२.......................९१.११

एकूण................................६,४१,८१६.....................................४,५९,५३३..............४,२५,९०६.............३३,६२७....................९२.६८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण