शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आयुष्याच्या सायंकाळी लाखभर वृद्ध शिकले लेखन- वाचन; नवभारत साक्षरता अभियानास प्रतिसाद

By राम शिनगारे | Updated: May 16, 2024 14:35 IST

परीक्षेचा निकाल जाहीर, ९ हजार ४१२ वृद्धांना सुधारणा करावी लागणार

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात राबविण्यात आलेल्या उल्लास-नवभारत साक्षरता अभियानात ६६ वर्षांवरील तब्बल ९६ हजार ५१८ जण साक्षर बनले आहेत. मागील शैक्षणिक सत्रापासून सुरू केलेल्या या अभियानात निरक्षरांना शिकविल्यानंतर साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात ६६ वर्षांवरील ९६ हजार ५१७ जण उत्तीर्ण झाले आहेत तर ९ हजार ४१२ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा मिळाला आहे.

केंद्र सरकारने देशभरात उल्लास- नवभारत साक्षरता अभियान २०२२-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला राज्यभरातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार संबंधितांना साक्षर करण्यासाठी अध्यापन केले. वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर निरक्षरांची १७ मार्चला उत्तीर्णतेची चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ५९ हजार ५३३ असाक्षरांनी नोंदणी केली होती. त्यातील ४ लाख २५ हजार ९०६ जण उत्तीर्ण झाले आहेत तर ३३ हजार ६२७ जणांना सुधारणा आवश्यक असा शेरा मिळाला. ४ लाख ४९ हजार ५३३ परीक्षार्थींमध्ये १ लाख ५ हजार ९३० परीक्षार्थींचे वय ६६ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यात ९६ हजार ५१८ निरक्षर या परीक्षेनंतर साक्षर बनल्याचे स्पष्ट झाले. विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या निरक्षर व्यक्तींना साक्षर बनविण्यासाठी मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेनुसार राज्यभरात २०२७ पर्यंत १०० टक्के नागरिकांना साक्षर बनविण्याचे टार्गेट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण संचालनालय योजना विभाग कार्य करीत आहे.

अक्षर ओळख, स्वाक्षरीची आवश्यकतानिरक्षरांना साक्षर बनविण्याच्या मोहिमेमागे निरक्षर असलेल्या व्यक्तींना किमान अक्षरांची ओळख होणे, स्वत:ची स्वाक्षरी करता यावी, ई-मेल करणे, एटीएममधून पैसे काढणे आणि भरता यावेत, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साक्षरतेसह डिजिटल साक्षरतेला यातून प्राधान्य देण्यात आले आहे.

स्त्रियांची संख्या सर्वांधिकराज्यात नवसाक्षरता अभियानात सर्वाधिक नोंदणी स्त्रियांनी केली होती. उल्लास ॲपवर १ लाख ८८ हजार ६२८ पुरुषांनी तर ४ लाख ५३ हजार ५९ स्त्रियांनी साक्षरतेसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार परीक्षा दिलेल्यांमध्ये पुरुषांची संख्या १ लाख ३९ हजार ५८२ एवढी होती तर ३ लाख १९ हजार ९४५ स्त्रियांनी साक्षरतेची परीक्षा दिली असल्याचेही शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाने जाहीर केले आहे.

साक्षरता अभियानाची राज्यातील आकडेवारी

वयोगट...................उल्लास ॲपवर एकूण नोंदणी..................परीक्षार्थी.............उत्तीर्ण..............सुधारणा आवश्यक........उत्तीर्ण टक्केवारी

१५ ते ३५ वर्ष.....................१,१३,११०.....................................८०,६१६..............७७,६३४..................२९८२........................९६.३०

३६ ते ६५ वर्ष....................३,८६,१८२....................................२,७२,९८७...........२,५१,७५४...............२१,२३३....................९२.२२

६६ वर्षावरील...................१,४२,५२६.....................................१,०५,९३०..............९६,५१८..................९४१२.......................९१.११

एकूण................................६,४१,८१६.....................................४,५९,५३३..............४,२५,९०६.............३३,६२७....................९२.६८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण