शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सहा दशकांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने...

By विकास राऊत | Updated: April 20, 2023 15:43 IST

सहा जनगणना : औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढला

छत्रपती संभाजीनगर : भारत जगात लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आला असून, जिल्ह्यातील लोकसंख्या वृध्दीचाही त्यात खारीचा वाटा आहे. सहा दशकांत जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने चालली आहे. १९९० च्या दशकातील औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढत गेला आहे. १९६१ ते २०११ पर्यंत सहावेळा जनगणना झाली असून, सातवी जनगणना झाल्यानंतर जिल्हा निश्चितपणे ४० लाखांची पायरी ओलांडेल. १९५१ साली १० लाखांच्या आसपास जिल्ह्याची लाेकसंख्या होती. जालना जिल्ह्याची निर्मिती १९८१ साली झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या आकड्यात बदल झाले. १९९१ ते २०११ पर्यंतच्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या वृध्दीचा दर वाढत गेला.

जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुका असलेला जालना १ मे १९८१ रोजी जिल्हा म्हणून स्थापित झाला. छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत असलेले जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुक्यांसह परभणीतील दोन तालुके मिळून हा जिल्हा झाल्यानंतर लोकसंख्येचे विभाजन झाले.

जनगणना वर्ष------लोकसंख्या१९६१------------ग्रामीण---१३ लाख १५ हजार ६३०

                        शहरी----२ लाख १६ हजार ७११                        एकूण --१५ लाख ३२ हजार ३४२

१९७१------------ग्रामीण--१० लाख २४ हजार ८६२

                        शहरी----३ लाख ७६ हजार ७१२                        एकूण--१४ लाख १ हजार ५७४

१९८१------------ग्रामीण--११ लाख ८१ हजार ७६६

                        शहरी----३ लाख ९४ हजार ३७८                        एकूण--१५ लाख ८१ हजार ७६६

१९९१------------ग्रामीण--१४ लाख ८८ हजार ६३६

                        शहरी----७ लाख २५ हजार १४३                        एकूण--२२ लाख १३ हजार ७७९

२००१------------ग्रामीण--१८ लाख ९ हजार ८६३

                        शहरी----१० लाख ८७ हजार १५०                        एकूण---२८ लाख ९७ हजार १३

२०११------------ग्रामीण--२० लाख ८१ हजार ११२

                        शहरी----१६ लाख २० हजार १७०                        एकूण--३७ लाख १ हजार २८२

१ लाख ४७ हजार ६५६ महिलांची संख्या कमी----जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सध्या ३७ लाख १ हजार २८२ इतकी आहे. यात १९ लाख २४ हजार ४६९ पुरुष, तर १७ लाख ७६ हजार ८१३ महिलांची संख्या आहे. एकूण लोकसंख्येत १ लाख ४७ हजार ६५६ महिलांची संख्या कमी आहे.

१९७१ सालानंतर नागरीकरण वाढले...१९७१ सालानंतर नागरीकरण वाढले. शहराची लाेकसंख्या ७८.८३ टक्क्यांनी वाढली. १९८१ ला ते प्रमाण घटून ५ टक्क्यांवर आले. त्यानंतर १९९१ साली ८३ टक्क्यांनी शहरी लोकसंख्या वाढली. २००१ व २०११ सालच्या जनगणनेत ४९ टक्क्यांची वाढ शहरी लाेकसंख्येत असल्याचे आढळून आले. दशवार्षिक लाेकसंख्या वाढीचा दर २७.७६ टक्के राहिला आहे.

राज्याच्या लोकसंख्येत ३.२ टक्के वाटा..जिल्ह्याच्या लोकसंख्येचा राज्याच्या लोकसंख्येत ३.२ टक्के वाटा आहे. राज्य लोकसंख्या घनतेचा दर प्रती चौरस कि.मी.३६५ व्यक्ती असून, जिल्ह्याची लोकसंख्या घनता प्रती चौ.कि.मी.मागे ३६६ व्यक्ती प्रमाणात आहे. ७९.२ टक्के जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद