शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

शहागंजमध्ये सतत दोन दिवस मनपाची कारवाई; अतिक्रमण मुक्तीनंतर ‘चमन’बहरला!

By मुजीब देवणीकर | Updated: April 30, 2024 19:50 IST

शहागंज चमन परिसरात शेकडोच्या संख्येने फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते, मनपाच्या कारवाईनंतर चमन परिसराने घेतला मोकळा श्वास.

छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त केल्यानंतर महापालिकेने शहागंज चमन परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा विडा उचलला. दोन दिवस सतत कारवाई केल्यानंतर अतिक्रमणमुक्त चमन बहरला. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. मंगळवारी दुपारी सिटीचौकातील अत्तर गल्लीत कारवाईला सुरूवात करण्यात आली. येथील अरुंद गल्ल्यांमध्ये जेसीबी जात नसल्याने व्यापाऱ्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला. अतिक्रमण काढल्यानंतर दररोज मनपाचे पथक संपुर्ण परिसरात पेट्रोलिंग करणार आहे.

शहागंज भागात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. व्यापारी, फळ विक्रेत्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. चारचाकी वाहन तर या भागातून ये-जा करू शकत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीने शहर बसेसही बंद केल्या. दुचाकी वाहनधारकांनाही प्रचंड त्रास होता. यापूर्वी अनेकदा मनपाने अतिक्रमणे हटविली. आज कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी तिच परिस्थिती राहत होती. यंदा मनपाने कारवाईच्या पॅटर्नमध्ये थोडासा बदल केला. सोमवारी शहागंज पेट्रोल पंप, क्लॉक टॉवरची चप्पल गल्लीत कारवाई केली. मंगळवारी चमनच्या परिसरातील सर्व अतिक्रमणे हटविली. निझामोद्दीन चौकातून संस्थान गणपतीकडे लेफ्ट टर्न घेताना एका फळ विक्रेत्याने अतिक्रमण केले होते. हा लेफ्ट टर्न पूर्णपणे मोकळा केला.

या भागात मनपाने पेट्रोलिंग सुरू केली. दुपारनंतर अतिक्रमण हटाव विभागाचा ताफा सिटीचौकात दाखल झाला. अत्तर गल्लीतून सुरूवात केली. अत्तर गल्लीतील छोट्या-छोट्या गल्ल्यांमधील अतिक्रमणे व्यापाऱ्यांनी स्वत: काढायला सुरूवात केली. उद्या सुद्धा याच भागात कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. कारवाईत उपायुक्त सविता सोनवणे यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण