शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

पाच वर्षांत कृषी विभागाने जप्त केले १६ कोटींचे बोगस बियाणे, तब्बल २९१ गुन्हे नोंदवले

By बापू सोळुंके | Updated: December 1, 2023 15:17 IST

मागील पाच वर्षात किती बियाणे कंपन्यांना आणि विक्रेत्याला न्यायालयात शिक्षा झाली याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना बोगस आणि निकृष्ट बियाणे मिळू नये, यासाठी शासनाचे प्रयत्न असतात. मागील पाच वर्षात राज्यभरात कृषी विभागाने बोगस आणि अप्रमाणित बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांसह कंपन्यांविरोधात तब्बल २९१ गुन्हे पोलिसांत नोंदविले आणि ४४३४ प्रकरणात कोर्टात खटले भरले. पण, मागील पाच वर्षात किती बियाणे कंपन्यांना आणि विक्रेत्याला न्यायालयात शिक्षा झाली याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.

दरवर्षी कृषी विभागाचे अधिकारी बाजारात दाखल विविध कंपन्यांच्या बियाणांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करतात. बोगस बियाणेही विक्रीला आल्याचे नजरेस पडताच कृषी विभागाकडून पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो. प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे संबंधित कंपनी आणि विक्रेत्यावर कोर्टात खटला दाखल करण्याचे अधिकार कृषी अधिकाऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके मिळावेत, यासाठी राज्यात अनेक कायदे आहेत.

या कायद्यानुसार राज्यात मागील पाच वर्षात २९१ पोलिसांत गुन्हे नोंदविले आणि ४४३४ प्रकरणात कोर्टात खटले दाखल करण्यात आले. पाच वर्षात तब्बल १६ कोटी २४ लाखांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने राज्यात बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासाठी एमपीडीएच्या तरतुदी असलेला नवा कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्याचा महाराष्ट्रातील आणि परराज्यातील बियाणे कंपन्यांनी विरोध सुरू केला आहे.

नव्या कायद्याचे स्वागत करायला हवेबियाणे कंपन्यांनी प्रस्तावित कायद्याला घाबरण्याचे कारण नाही, राज्यात चांगले काम करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांनी तर या कायद्याचे स्वागत करायला हवे. शेतकऱ्यांना दरवर्षी बोगस आणि निकृष्ट बियाणे विकून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणाऱ्या कंपन्यांनी याचा धसका घ्यायला हवा.- विकास पाटील, संचालक, बियाणे आणि निविष्ठा गुणनियंत्रक संचालक कृषी विभाग

महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय बियाणे कंपन्या-५३६महाराष्ट्रातील बियाणे कंपन्यांची संख्या-१०४४परवानाधारक एकूण बियाणे कंपन्या - १५८०सन २०१९-२३ कारवाईची माहितीराज्यातील परवानाधारक बियाणे विक्रेते- ४५,२३१कृषी गुणनियंत्रक पथकाने तपासणी केलेल्या दुकानांतील बियाणे नमुने संख्या- १,१४,८०९बियाणे उत्पादक कंपनीतील तपासणी नमुन्यांची संख्या- १२८४अप्रमाणित बियाणे नमुने-८४३३कोर्ट केसेस-४४३४पोलिसांत गुन्हे--२९१परवाने निलंबन---६३६परवाने रद्द-- २०८

फक्त कंपन्या जबाबदार नाहीबियाणे उगवण्यास जमीन, पाणी, पाऊस आणि खते, कीटकनाशक आणि निसर्ग आदी घटक कारणीभूत असतात. मात्र याबाबींचा विचार न करता बियाणाच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रार आल्यास थेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे. एवढेच नव्हे तर हा गुन्हा अजामीनपात्र आणि एमपीडीएसारखा कडक असल्याने बियाणे कंपन्यांच्या संचालकांना अटकेची यात तरतूद आहे. यापूर्वी बियाणाविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करून निर्णय देत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बऱ्याचदा बियाणे कंपन्या, विक्रेते शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही देतात. ग्राहक मंचात दादही मागता येते.- समीर मुळे, अध्यक्ष, महाराष्ट्र सीड उत्पादक असोसिएशन

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद