शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुकडाबंदीचे उल्लंघन करत रजिस्ट्रींचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 20:21 IST

ग्रामीण व शहरी भागातील दस्त नोंदणी वाढल्याने अनधिकृत वसाहती वाढण्याचा धोका

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मुद्रांक कार्यालयाच्या १३ शाखांतर्गत तुकडाबंदीचे उल्लंघन सुरू होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा मुद्रांक कार्यालयातील खिडकी क्रमांक ५ मध्ये शेकडो रजिस्ट्री तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून झाल्या आहेत. ६६५५ ते ६६६२, ६६४५ ते ६६५४ पर्यंतच्या दस्त नोंदणीमध्ये तुकडाबंदीचे उल्लंघन झाल्याची चर्चा आहे. हर्सूल, पडेगांव, पाेखरी परिसरातील एनए नसलेल्या भूखंडांची खरेदी-विक्रीचे व्यवहार रजिस्ट्री कार्यालयात नोंदणी अंती होत असल्याने कायद्याला हरताळ फासला गेला आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांचा सोयीनुसार अर्थ लावून मुद्रांक विभागाने रजिस्ट्रीचे व्यवहार करण्याचा सपाटा लावला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केली समितीतुकडाबंदीचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींमुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रजिस्ट्री तपासण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. समितीने मुद्रांक विभागाकडून वर्षभरातील दस्त नोंदणीचे रेकॉर्ड मागविले असून, त्याच्या छाननीअंती सगळे प्रकरण समोर येईल.

नोंदणी रेकॉर्ड तपासणारतुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी (रजिस्ट्री) झाली असेल, तर त्याचे पूर्ण रेकॉर्ड तपासण्यात येईल. ९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत नोंदविण्याची माहिती घेण्यात येईल.- विजय भालेराव, नोंदणी उपमहानिरीक्षक

तुकडी बंदी रद्द झाल्यानंतर काय?राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून तुकडा बंदी नियमाचे परिपत्रक काढल्यानंतर एनए-४४ वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्रीवर बंधने आली. मुद्रांकावर (बॉण्ड) मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचा सपाटा सुरू झाला. तुकडा बंदीमुळे गुंठेवारी वसाहतींसह शहरालगतच्या एनए नसलेल्या सर्व वसाहतींमधील प्लॉट व जुन्या बांधकामांचे व्यवहार ठप्प झाल्याने रजिस्ट्री विभागाने सोयीनुसार पळवाटा काढून नोंदणीचा धुमाकूळ सुरू केला आहे. तीन वर्षांपासून अर्धा एकरपेक्षा कमी जागा विक्री होत नसल्याने जागा मालकांची रजिस्ट्री करून देणारी टोळी सर्रासपणे लूट करीत आहे. कर्जबाजारी होऊन अनेकांना कुटुंबातील मंगल कार्य उरकावी लागली आहेत. तुकडाबंदीमुळे सावकारांकडे जमिनी गहाण टाकल्या आहेत.

बेकायदेशीर मालमत्तेचे तोटे असे :व्यवहाराचे दस्तवेज न्यायालयीन पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. बांधकाम परवाना मिळत नाही. बँकांकडून कर्ज मिळत नाही. सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव लागत नाही. चतु:सीमा निश्चित होणार नाही. नागरी सुविधा मिळणार नाहीत. नागरिकांची फसवूणक होऊ शकते. भूखंड, शेतीची पुनर्विक्री करणे अवघड होते.

अधिकृत मालमत्ता घेण्याचे फायदे असे :बांधकाम परवाना, नागरी सुविधा, बँकेकडून कर्ज, केंद्र व राज्य शासन योजनांचा लाभ, सातबारा, मालमत्ता पत्रकावर स्वतंत्र नाव, अतिक्रमण होत नाही. पुन:विक्रीचे व्यवहार सुरळीत होतात. न्यायालयीन पुरावा म्हणून दस्तवेज गृहीत धरले जातात. नागरिकांचे आणि शासनाचे नुकसान होत नाही.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग