शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार भाकड जनावरांवर होणार वंध्यत्व उपचार

By विजय सरवदे | Updated: December 1, 2023 17:26 IST

भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावेत, यासाठी ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : दुधाच्या उत्पादन वाढीसाठी गाय-म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे तसेच भाकड जनावरांवर उपचार करुन त्यांची उत्पादन क्षमता विकसित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गुरूवारपासून वंध्यत्व निवारणाची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात अशा २५ हजार २८८ जनावरांवर वंध्यत्व उपचार केले जाणार आहेत. लम्पी आजाराची साथ आटोक्यात आल्यामुळे विभागाने वंध्यत्व निवारण शिबिरावर भर दिला आहे.

भाकड व वंध्यत्व पशुधनावर उपचार करुन ते उत्पादनात आणता यावेत, यासाठी ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना, तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावपातळीवर असलेले लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयांच्या कार्यक्षेत्रात ही शिबिरे होणार आहेत. त्यासाठी २५ हजार २८८ एवढी भाकड जनावरे निश्चित केली असून त्यांच्यावर उपचार करून उत्पादनात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

पशू प्रजननाशी अपेक्षित शारीरिक वजन व वाढ याचा थेट संबंध आहे. कमी वजन अथवा वाढ होत नसलेल्या जनावरांमध्ये प्रामुख्याने वंध्यत्वाची शक्यता असते. त्यांना आपल्याकडे भाकड जनावरे, असे संबोधले जाते. अशा जनावरांची तपासणी करून संतुलित पशुआहार, खनिज मिश्रण पोषक आहार देण्यासंबंधी पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये तज्ज्ञ टीमद्वारे सर्व गायी-म्हशींची तपासणी करण्यात येऊन योग्य ते उपचारही करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ११ लाख पशुधनयासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, जिल्ह्यात सर्व मिळून ११ लाख पशुधन असून यात गाय व म्हैस वर्गीय जनावरांची संख्या ६ लाख ३३ हजार एवढी आहे. यापैकी उत्पादनात नसलेल्या (भाकड) पशुधनाची संख्या २५ हजार २८८ एवढी आहे. या भाकड जनावरांवर उपचार करून त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. पशुपालकांनी १९ डिसेंबर चालणाऱ्या वंध्यत्व निवारण शिबिरांमध्ये आपल्याकडील भाकड जनावरांवर उपचार करुन घ्यावेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र