शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगरात गत दहा महिन्यांत तब्बल ४५ मुले ‘नकोशी’

By सुमित डोळे | Updated: October 23, 2023 15:37 IST

फेकू नका, आम्ही त्याचे कुटुंब होऊ, गोपनीयताही आयुष्यभर पाळू; बालकल्याण समितीचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : अजाणत्या वयात झालेली चूक, अत्याचार, अनैतिक संबंध किंवा अठरा विश्वे दारिद्र्य, अशा अनेक कारणांतून जन्मदात्यांना मूल नकाेसे असते. सहा दिवसांमध्ये शहरात अशा पाच बालकांचा जन्मदात्यांनी त्याग केला. त्यात तिघांना अक्षरश: उघड्यावर फेकले गेले. वेळीच लक्षात आल्याने मोकाट जनावरांनी लचके तोडण्याआधीच त्यांचा जीव वाचला. गेल्या १० महिन्यांत अशी १३ नवजात बालके रस्त्यावर फेकून दिली गेली, तर ३१ पालकांनी समितीकडे सोपवून जन्मत:च पोटच्या बाळासोबत संबंध तोडल्याची हृदयद्रावक माहिती पाहणीत दिसली.

कर्णपुरा यात्रेत शनिवारी पहाटे भाविकांची मोठी गर्दी होती. एकीकडे मोठा भक्तांचा जयघोष, तर दुसरीकडे हॉटेलमध्ये गाण्यांची, ग्राहकांची रेलचेल होती. याच कर्कश आवाजात बऱ्याच वेळापासून कोपऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. रडण्याचा आवाज वाढत गेल्याने काही सुजाण नागरिकांनी ते गांभीर्याने घेत शोध घेतला. कुत्रे पोहोचण्याआधीच स्थानिकांनी त्याला कुशीत घेतले. पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने कटके यांच्या सूचनेवरून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

आठवड्यातली तिसरी घटना१७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता अंदाजे अडीच महिन्यांची मुलगी अज्ञातांनी ज्योतीनगरच्या साकार संस्थेच्या पाळण्यात सोडून दिली. त्यापूर्वी छावणीत एक दिवसाचे बाळ रस्त्याच्या कडेल फेकलेले आढळले, तर शनिवारी तिसरे बाळ कर्णपुऱ्यात आढळले. याच आठ दिवसांत दोन महिलांनी समितीकडे मुलींना सोडून दिले. २०२२-२३ मध्ये एकूण ४५ मुलांचा जन्मदात्यांनी त्याग केला.

सुरक्षितरीत्या परित्यागअत्याचारातून, अजाणत्या वयातले संबंध, गरिबी वा अन्य कारणांतून झालेले मूल नकाेसे झाल्यानंतर पालक समितीकडे बाळ सोपवत असतील तर त्याला परित्यागित (सरेंडर) म्हणतात. अशी १० महिन्यांत १६ मुले, तर १५ मुली समितीकडे प्राप्त झाल्या. त्याशिवाय गत आठवड्यात २ थेट समिती, तर १ मुलगी साकारमध्ये प्राप्त झाली. याच कालावधीत कठोरपणे ६ मुले व ६ मुली रस्त्यावर फेकून दिली.

फेकण्याऐवजी समितीकडे द्या-शासनाच्या २०१५ च्या बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बालकल्याण समिती अशा परित्यागित मुलांचा सांभाळ करू शकते. मूल नको असलेले पालक त्याला फेकण्याऐवजी समितीकडे सोपवू शकतात.-त्याची रीतसर शासनदरबारी ऑनलाइन नोंदणी होऊन नवीन नाव मिळते.-सुरक्षित राहून दत्तक गेल्यास हक्काचे कुटुंबही मिळते.-१८ वर्षांपर्यंत त्याचा सांभाळ होतो. त्यानंतरही अनुरक्षणग्रह प्रक्रियेंतर्गत पुढील शिक्षणाचीही सोय शासन करते.

नसता तुम्ही गुन्हेगारबाळाला असे उघड्यावर फेकून देणाऱ्या पालकांवर भादंवि ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.जिल्ह्यात वयोगट ० - ६ बाळांचा सांभाळ करण्यासाठी २ संस्था असून, ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी १४ संस्था आहेत.

जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नकामुलं नको असण्यास समितीकडे सोपवून त्याला त्याचा जगण्याचा अधिकार द्या. त्याला कुटुंब मिळेल. शिक्षण मिळेल. यात जन्मदात्यांची ओळख कायम गोपनीय ठेवली जाते.- ॲड. आशा शेरखाने कटके, अध्यक्ष, बालकल्याण समिती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी