शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

छत्रपती संभाजीनगरात गत दहा महिन्यांत तब्बल ४५ मुले ‘नकोशी’

By सुमित डोळे | Updated: October 23, 2023 15:37 IST

फेकू नका, आम्ही त्याचे कुटुंब होऊ, गोपनीयताही आयुष्यभर पाळू; बालकल्याण समितीचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : अजाणत्या वयात झालेली चूक, अत्याचार, अनैतिक संबंध किंवा अठरा विश्वे दारिद्र्य, अशा अनेक कारणांतून जन्मदात्यांना मूल नकाेसे असते. सहा दिवसांमध्ये शहरात अशा पाच बालकांचा जन्मदात्यांनी त्याग केला. त्यात तिघांना अक्षरश: उघड्यावर फेकले गेले. वेळीच लक्षात आल्याने मोकाट जनावरांनी लचके तोडण्याआधीच त्यांचा जीव वाचला. गेल्या १० महिन्यांत अशी १३ नवजात बालके रस्त्यावर फेकून दिली गेली, तर ३१ पालकांनी समितीकडे सोपवून जन्मत:च पोटच्या बाळासोबत संबंध तोडल्याची हृदयद्रावक माहिती पाहणीत दिसली.

कर्णपुरा यात्रेत शनिवारी पहाटे भाविकांची मोठी गर्दी होती. एकीकडे मोठा भक्तांचा जयघोष, तर दुसरीकडे हॉटेलमध्ये गाण्यांची, ग्राहकांची रेलचेल होती. याच कर्कश आवाजात बऱ्याच वेळापासून कोपऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. रडण्याचा आवाज वाढत गेल्याने काही सुजाण नागरिकांनी ते गांभीर्याने घेत शोध घेतला. कुत्रे पोहोचण्याआधीच स्थानिकांनी त्याला कुशीत घेतले. पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने कटके यांच्या सूचनेवरून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

आठवड्यातली तिसरी घटना१७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता अंदाजे अडीच महिन्यांची मुलगी अज्ञातांनी ज्योतीनगरच्या साकार संस्थेच्या पाळण्यात सोडून दिली. त्यापूर्वी छावणीत एक दिवसाचे बाळ रस्त्याच्या कडेल फेकलेले आढळले, तर शनिवारी तिसरे बाळ कर्णपुऱ्यात आढळले. याच आठ दिवसांत दोन महिलांनी समितीकडे मुलींना सोडून दिले. २०२२-२३ मध्ये एकूण ४५ मुलांचा जन्मदात्यांनी त्याग केला.

सुरक्षितरीत्या परित्यागअत्याचारातून, अजाणत्या वयातले संबंध, गरिबी वा अन्य कारणांतून झालेले मूल नकाेसे झाल्यानंतर पालक समितीकडे बाळ सोपवत असतील तर त्याला परित्यागित (सरेंडर) म्हणतात. अशी १० महिन्यांत १६ मुले, तर १५ मुली समितीकडे प्राप्त झाल्या. त्याशिवाय गत आठवड्यात २ थेट समिती, तर १ मुलगी साकारमध्ये प्राप्त झाली. याच कालावधीत कठोरपणे ६ मुले व ६ मुली रस्त्यावर फेकून दिली.

फेकण्याऐवजी समितीकडे द्या-शासनाच्या २०१५ च्या बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बालकल्याण समिती अशा परित्यागित मुलांचा सांभाळ करू शकते. मूल नको असलेले पालक त्याला फेकण्याऐवजी समितीकडे सोपवू शकतात.-त्याची रीतसर शासनदरबारी ऑनलाइन नोंदणी होऊन नवीन नाव मिळते.-सुरक्षित राहून दत्तक गेल्यास हक्काचे कुटुंबही मिळते.-१८ वर्षांपर्यंत त्याचा सांभाळ होतो. त्यानंतरही अनुरक्षणग्रह प्रक्रियेंतर्गत पुढील शिक्षणाचीही सोय शासन करते.

नसता तुम्ही गुन्हेगारबाळाला असे उघड्यावर फेकून देणाऱ्या पालकांवर भादंवि ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.जिल्ह्यात वयोगट ० - ६ बाळांचा सांभाळ करण्यासाठी २ संस्था असून, ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी १४ संस्था आहेत.

जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नकामुलं नको असण्यास समितीकडे सोपवून त्याला त्याचा जगण्याचा अधिकार द्या. त्याला कुटुंब मिळेल. शिक्षण मिळेल. यात जन्मदात्यांची ओळख कायम गोपनीय ठेवली जाते.- ॲड. आशा शेरखाने कटके, अध्यक्ष, बालकल्याण समिती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी