शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

छत्रपती संभाजीनगरात गत दहा महिन्यांत तब्बल ४५ मुले ‘नकोशी’

By सुमित डोळे | Updated: October 23, 2023 15:37 IST

फेकू नका, आम्ही त्याचे कुटुंब होऊ, गोपनीयताही आयुष्यभर पाळू; बालकल्याण समितीचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : अजाणत्या वयात झालेली चूक, अत्याचार, अनैतिक संबंध किंवा अठरा विश्वे दारिद्र्य, अशा अनेक कारणांतून जन्मदात्यांना मूल नकाेसे असते. सहा दिवसांमध्ये शहरात अशा पाच बालकांचा जन्मदात्यांनी त्याग केला. त्यात तिघांना अक्षरश: उघड्यावर फेकले गेले. वेळीच लक्षात आल्याने मोकाट जनावरांनी लचके तोडण्याआधीच त्यांचा जीव वाचला. गेल्या १० महिन्यांत अशी १३ नवजात बालके रस्त्यावर फेकून दिली गेली, तर ३१ पालकांनी समितीकडे सोपवून जन्मत:च पोटच्या बाळासोबत संबंध तोडल्याची हृदयद्रावक माहिती पाहणीत दिसली.

कर्णपुरा यात्रेत शनिवारी पहाटे भाविकांची मोठी गर्दी होती. एकीकडे मोठा भक्तांचा जयघोष, तर दुसरीकडे हॉटेलमध्ये गाण्यांची, ग्राहकांची रेलचेल होती. याच कर्कश आवाजात बऱ्याच वेळापासून कोपऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. रडण्याचा आवाज वाढत गेल्याने काही सुजाण नागरिकांनी ते गांभीर्याने घेत शोध घेतला. कुत्रे पोहोचण्याआधीच स्थानिकांनी त्याला कुशीत घेतले. पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने कटके यांच्या सूचनेवरून त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले.

आठवड्यातली तिसरी घटना१७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता अंदाजे अडीच महिन्यांची मुलगी अज्ञातांनी ज्योतीनगरच्या साकार संस्थेच्या पाळण्यात सोडून दिली. त्यापूर्वी छावणीत एक दिवसाचे बाळ रस्त्याच्या कडेल फेकलेले आढळले, तर शनिवारी तिसरे बाळ कर्णपुऱ्यात आढळले. याच आठ दिवसांत दोन महिलांनी समितीकडे मुलींना सोडून दिले. २०२२-२३ मध्ये एकूण ४५ मुलांचा जन्मदात्यांनी त्याग केला.

सुरक्षितरीत्या परित्यागअत्याचारातून, अजाणत्या वयातले संबंध, गरिबी वा अन्य कारणांतून झालेले मूल नकाेसे झाल्यानंतर पालक समितीकडे बाळ सोपवत असतील तर त्याला परित्यागित (सरेंडर) म्हणतात. अशी १० महिन्यांत १६ मुले, तर १५ मुली समितीकडे प्राप्त झाल्या. त्याशिवाय गत आठवड्यात २ थेट समिती, तर १ मुलगी साकारमध्ये प्राप्त झाली. याच कालावधीत कठोरपणे ६ मुले व ६ मुली रस्त्यावर फेकून दिली.

फेकण्याऐवजी समितीकडे द्या-शासनाच्या २०१५ च्या बालन्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत बालकल्याण समिती अशा परित्यागित मुलांचा सांभाळ करू शकते. मूल नको असलेले पालक त्याला फेकण्याऐवजी समितीकडे सोपवू शकतात.-त्याची रीतसर शासनदरबारी ऑनलाइन नोंदणी होऊन नवीन नाव मिळते.-सुरक्षित राहून दत्तक गेल्यास हक्काचे कुटुंबही मिळते.-१८ वर्षांपर्यंत त्याचा सांभाळ होतो. त्यानंतरही अनुरक्षणग्रह प्रक्रियेंतर्गत पुढील शिक्षणाचीही सोय शासन करते.

नसता तुम्ही गुन्हेगारबाळाला असे उघड्यावर फेकून देणाऱ्या पालकांवर भादंवि ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.जिल्ह्यात वयोगट ० - ६ बाळांचा सांभाळ करण्यासाठी २ संस्था असून, ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी १४ संस्था आहेत.

जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नकामुलं नको असण्यास समितीकडे सोपवून त्याला त्याचा जगण्याचा अधिकार द्या. त्याला कुटुंब मिळेल. शिक्षण मिळेल. यात जन्मदात्यांची ओळख कायम गोपनीय ठेवली जाते.- ॲड. आशा शेरखाने कटके, अध्यक्ष, बालकल्याण समिती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी