शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी 

By स. सो. खंडाळकर | Updated: November 13, 2023 15:47 IST

ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात.

छत्रपती संभाजीनगर : ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी व कर्मचाऱ्यांविनाच चालवावा लागत असून योजना राबवताना अनेक अडचणींना समाोरे जावे लागत असल्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात. ही दुरवस्था पाहून मध्यंतरी सामाजिक न्याय विभागाकडून ६६ अधिकारी व कर्मचारी ओबीसी मंत्रालयाकडे वर्ग करण्याचा शासननिर्णय घेण्यात आला. पण तो अद्याप तरी कागदावरच असल्याचे दिसून येते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ च्या शासन आदेशान्वये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले होते व ३७० अधिकारी व कर्मचारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वर्ग करण्यास मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात असे घडले नाही.तांडा वस्ती सुधार योजना, अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण वसाहतमुक्त योजना दारिद्र्य रेषेखालील ओबीसींना घरकुल योजना देणाऱ्या आहेत. मात्र जिल्हा स्तरावर अधिकारीच नसल्याने या योजनांना उद्दिष्ट गाठता आले नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांप्रमाणे जिल्हा ओबीसी कल्याण अधिकारी नियुक्त करून ओबीसींच्या योजना राबविण्यावर भर देण्याची गरज असताना शासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. जिल्ह्यात असे अधिकारी नेमण्याची मागणी विविध ओबीसी संघटनांनी वारंवार निवेदने देऊन केली. पण त्याची दखल घेतली गेली नाही.

तब्बल १८ योजनांवर परिणामविमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृ्ती अंतर्गत एकूण नऊ योजना तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नऊ योजना अशा एकूण १८ योजना असून त्या अधिकारी व कर्मचारीच नसल्याने राबवता येत नाहीत. पंतप्रधान मोदी आवास योजनेला दहा लाख ओबीसींना घरकुल देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु अधिकारी व कर्मचारीच नसल्याने या योजनेलाही खो बसत आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे