शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी 

By स. सो. खंडाळकर | Updated: November 13, 2023 15:47 IST

ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात.

छत्रपती संभाजीनगर : ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी व कर्मचाऱ्यांविनाच चालवावा लागत असून योजना राबवताना अनेक अडचणींना समाोरे जावे लागत असल्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात. ही दुरवस्था पाहून मध्यंतरी सामाजिक न्याय विभागाकडून ६६ अधिकारी व कर्मचारी ओबीसी मंत्रालयाकडे वर्ग करण्याचा शासननिर्णय घेण्यात आला. पण तो अद्याप तरी कागदावरच असल्याचे दिसून येते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ च्या शासन आदेशान्वये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले होते व ३७० अधिकारी व कर्मचारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वर्ग करण्यास मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात असे घडले नाही.तांडा वस्ती सुधार योजना, अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण वसाहतमुक्त योजना दारिद्र्य रेषेखालील ओबीसींना घरकुल योजना देणाऱ्या आहेत. मात्र जिल्हा स्तरावर अधिकारीच नसल्याने या योजनांना उद्दिष्ट गाठता आले नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांप्रमाणे जिल्हा ओबीसी कल्याण अधिकारी नियुक्त करून ओबीसींच्या योजना राबविण्यावर भर देण्याची गरज असताना शासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. जिल्ह्यात असे अधिकारी नेमण्याची मागणी विविध ओबीसी संघटनांनी वारंवार निवेदने देऊन केली. पण त्याची दखल घेतली गेली नाही.

तब्बल १८ योजनांवर परिणामविमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृ्ती अंतर्गत एकूण नऊ योजना तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नऊ योजना अशा एकूण १८ योजना असून त्या अधिकारी व कर्मचारीच नसल्याने राबवता येत नाहीत. पंतप्रधान मोदी आवास योजनेला दहा लाख ओबीसींना घरकुल देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु अधिकारी व कर्मचारीच नसल्याने या योजनेलाही खो बसत आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे